Wednesday, August 26, 2026
Homeचंद्रपूरजंगल परिसरात तेंदूपाने तोडण्यासाठी गेलेल्या महिलांवर वाघाचा हल्ला; चार महिलांचा मृत्यू..

जंगल परिसरात तेंदूपाने तोडण्यासाठी गेलेल्या महिलांवर वाघाचा हल्ला; चार महिलांचा मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यात एक भयंकर घटना आज,शुक्रवार २२ मे रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली असून तेंदूपाने तोडण्यासाठी जंगल परिसरात गेलेल्या महिलांवर वाघाने हल्ला चढवून तब्बल चार महिलांना ठार केले आहे.सदरची घटना सिंदेवाही तालुक्याच्या गुंजेवाही जंगल परिसरात घडली.वाघाच्या हल्ल्यात संगीता संतोष चौधरी वय ३६ वर्षे,सुनीता कौशिक मोहुर्ले वय ३३ वर्षे,कवडूबाई दादाची मोहुर्ले वय ४५ वर्षे व अनुबाई दादाजी मोहुर्ले वय ४६ वर्षे अशी मृतक महिलांची नावे आहेत.विशेष म्हणजे,मागील वर्षाच्या १० मे २०२५ रोजी सिंदेवाही तालुक्यातीलच मेंढा(माल)येथील जंगल परिसरात वाघाने तब्बल तीन महिलांचा बळी गेला होता.त्यानंतरची ही दुसरी मोठी घटना आहे.
चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही जंगल परिसरात आज शुक्रवारी सकाळच्या सुमारास
गुंजेवाही येथील १३ महिला तेंदूपाने तोडण्यासाठी
जंगलात गेल्या होत्या.तेंदूपाने तोडत असतांनाच सकाळी ९ वाजेच्या दरम्यान दबा धरून बसलेल्या वाघाने महिलांवर अचानकपणे हल्ला चढवला.अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे महिला घाबरल्या व जिवाच्या आकांताने सैरावैरा पळत सुटल्या.अश्यातच चार महिलांवर वाघाने झडप घातली.त्यातच त्यांचा मृत्यू झाला.इतर महिलांपैकी एक महिला ओरडतच गावात गेली आणि तिने आरडाओरडा करत गावकऱ्यांना घडलेल्या घटनेची माहिती दिली.त्यानंतर ग्रामस्थांनी लाठ्याकाठ्या घेऊन घटनास्थळी धाव घेतली.त्यावेळी तिथे चार महिलांचे मृतदेह आढळून आले.घटनेची माहिती मिळताच सिंदेवाही वनपरिक्षेत्र अधिकारी अंजली सायंकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. वन विभागाचे अधिकारी,कर्मचारी आणि पोलिसांनी परिसराचा पंचनामा केला.वाघाच्या हालचालींचा शोध घेण्यासाठी गस्त वाढवण्यात आली असून वन विभागाने नागरिकांना जंगल परिसरात जाऊ नये,तसेच जाण्याबाबत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.घटनेने चौधरी व मोहुर्ले कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून गुंजेवाही गावात शोककळा पसरली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत निवडणूक आयोगाने मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण-२०२६(Special Intensive Revision-SIR)कार्यक्रमात सुधारणा केली असून,सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.त्यानुसार,येत्या ३१ ऑगस्ट २०२६...

राज्यातील सर्व शासकिय,खाजगी व धर्मादाय रुग्णालयांचे फायर ऑडिटसह संबंधित यंत्रणांचे ऑडिट करण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देतांना रुग्णालयांची सुरक्षा प्राधान्याची बाब आहे.राज्यातील सर्व शासकीय,खासगी व धर्मदाय आरोग्य संस्थांमधील...

५ टक्के दिव्यांग कल्याण निधीचा शंभर टक्के विनियोग करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश.. – नगरपरिषद व नगरपंचायत स्तरावर दिव्यांग कल्याणासाठी राखीव निधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचवावा. प्रलंबित UDID नोंदणी व वैद्यकीय तपासणी प्रक्रिया...

अखेर लाडक्या बहिणींच्या खात्यात दीड हजार जमा होण्याचा मार्ग मोकळा..

उद्रेक न्युज वृत्त :-रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारच्या 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.महायुती सरकारने माहे-जुलै-२०२६ च्या हप्त्याच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!