Friday, July 17, 2026
Homeबीडचोरट्याची अशीही ईमानदारी...चोरी केलेले दागिने दारापुढे ठेवले आणून.....

चोरट्याची अशीही ईमानदारी…चोरी केलेले दागिने दारापुढे ठेवले आणून…..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

बीड : चोरीस गेलेल्या मौल्यवान वस्तू दागिने परत मिळण्याची शाश्वती नसते.चोराचा छडा लावून मुद्देमाल हस्तगत करताना पोलिसांची दमछक होतांना दिसून येते.मात्र बीड शहरातील एका तक्रारदाराला चोरट्यांनी सुखद धक्का दिला आहे.कपाटातून लांबविलेले साडेचार तोळे दागिने दहा दिवसांनी दारापुढे आणून ठेवले.

चोराला उपरती आल्याच्या प्रकाराने तक्रारदारासह पोलिसही अचंबित झाले आहेत.सविता प्रल्हाद काशीद (४३, रा. पाडळसिंगी ता.गेवराई) या मामेबहिणीच्या लग्नकार्यासाठी बीडला नातेवाइकांकडे गेल्या होत्या.त्यांची आतेबहीण सुनीता म्हेत्रेही या मुक्कामी होत्या.

२७ जानेवारी रोजी दोघींचे दोन गंठण चोरट्यांनी कपाटातून लंपास केले.३० जानेवारी रोजी शहर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता.पोलीस निरीक्षक रवी सानप, उपनिरीक्षक रमेश गायकवाड, अंमलदार मनोज परजणे,आशपाक सय्यद, अविनाश सानप यांनी घटनास्थळी भेट दिली व  श्वानपथक पाचारण करून चोरीचा छडा लावण्याचा प्रयत्न केला.मात्र चोरीचा छडा न लागताच अज्ञात चोरट्यांनी १० दिवसांनी ५ फेब्रुवारी रोजी चोराने दारापुढे दोन मिनी गंठण आणून ठेवले असल्याने सर्वत्र चर्चेचा विषय ठरू लागला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महिला पोलीस उपनिरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात.. – ३ लाख रुपये घेतांना रंगेहाथ पकडले..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात गुन्हा 'बी' फायनल करण्यासाठी मदत केली व पुढे भविष्यातही अशीच मदत करण्यासाठी ८ लाख रुपयांची मागणी करून...

आज २२ मिनी सेतू केंद्रांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण.. दुर्गम भागात लोकाभिमुख डिजिटल प्रशासनाला नवी दिशा..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई/गडचिरोली :-गडचिरोलीत नक्षलवादाचा प्रभाव कमी झाल्यानंतर आता प्रशासनाची जबाबदारी अधिक वाढली असून दुर्गम भागातील नागरिकांना केवळ प्रशासनाची उपस्थिती नव्हे,तर प्रशासनाचा लोकाभिमुख चेहरा...

वनहक्क पट्टेधारकांसाठी मोठा निर्णय; शेतकरी म्हणून मिळणार स्वतंत्र ओळख.. – विविध योजनांचाही मिळणार लाभ..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-वनहक्क पट्टेधारकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.वनहक्क कायद्यांतर्गत पात्र ठरलेल्या अनुसूचित जमाती आणि इतर पारंपरिक वननिवासींना आता सुधारित सातबारा मिळणार असल्याने...

गडचिरोली जिल्ह्यात खतांचा मुबलक साठा; शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.. – खताची जादा दराने विक्री केल्यास करा तक्रार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात रासायनिक खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता व घाबरून न...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!