Saturday, March 15, 2025
Homeकोरचीग्रामपंचायत स्तरावरील अतिक्रमण धारकांची संख्या बळावली -पदाधिकारी हताश तर नागरिक त्रस्त
spot_img

ग्रामपंचायत स्तरावरील अतिक्रमण धारकांची संख्या बळावली -पदाधिकारी हताश तर नागरिक त्रस्त

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

कोरची :- शासकीय,निमशासकीय खुल्या जागेवर व मुख्य रस्त्यांवर ग्रामपंचायत स्तरावरील ग्रामीण भागात अतिक्रमण वाढतच चालले आहे.अतिक्रमण धारकांमुळे ग्रामपंचायत पदाधिकारी व गावातील नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे.

ग्रामपंचायत पदाधिकारी गावातील खुल्या जागेवर,मुख्य रस्त्यांवर अतिक्रमण केलेल्या नागरिकांना वारंवार सूचना व नोटीस बजावूनही अतिक्रमणधारक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांपुढे अतिक्रमण काढण्यासंदर्भात मोठे आव्हान उभे राहिले आहे.ग्रामीण भागात गावातील नागरिक ये-जा करणाऱ्या मुख्य रस्त्यांवर साहित्य ठेवणे,गायी, म्हशी,गुरे-ढोरे बांधणे व लाकूड फाटा ठेवत असल्याने नागरिकांना आवागमन करण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे.काही दुकान चालक रस्त्यावरच व्यवसाय करीत असल्याने वाहनधारकांना वाहने चालवीतांना मनस्ताप होत आहे.मुख्य रस्ता कमी तर अतिक्रमण जास्त अशी अवस्था झाली आहे. 

गावातील काही बलाढ्य पैसेधारक पैस्याच्या जोरावर चक्क शासकीय जागेवरच अतिक्रमण करून बसले आहेत.खुली जागा दिसली की त्यावर सहजरित्या ताबा मिळवून आपली जागा असल्याचा पावित्रा घेतला जात आहे.ग्रामपंचायत रेकॉर्डमध्ये नोंद नसतांनाही जागेवर अवैधरित्या बांधकाम करण्याचा सपाटा सुरू आहे.ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना न जुमानता ग्रामीण भागात आपल्याच मनाचा कारभार सुरू असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.यासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी,सचिव यांनी वरिष्ठ स्तरावरुन अतिक्रमण धारकांविरोधात धडक मोहीम राबविणे गरजेचे असल्याचे जनसमान्यांतुन बोलल्या जात आहे.

Udrek News

- Advertisement -
spot_imgspot_img

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपुरात..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यात उन्हाळा कडकु लागला आहे.त्यातच विदर्भात बहुतांश ठिकाणी उष्णतेची लाट आहे.आज,शनिवार १५ मार्च रोजी अकोला, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज...

नक्षलवाद्यांनी जंगलात पुरून ठेवलेली स्फोटके पोलिसांनी केली नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील नक्षलवाद संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.मोठ-मोठी नक्षली स्वतःहून पोलिसांपुढे आत्मसमर्पण करीत आहेत.काही नक्षली दाम्पत्य हिंसक मार्ग सोडून सुखी संसाराची स्वप्ने रंगवू लागली...

आत्ताची मोठी बातमी.. पाच मुलांचा घोडाझरी तलावात बुडून मृत्यू; दोन सख्खे भाऊ तर दोन चुलत भाऊ व एक मित्र..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील घोडाझरी येथे पर्यटनासाठी गेलेल्या सहा मुलांपैकी पाच मुलांचा  तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज,शनिवार १५ मार्च रोजी सायंकाळी ४...

फेसबुकवर भावनिक पोस्ट करीत बँकेच्या दारातच शिक्षकाने गळफास घेऊन केली आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  बीड :-शहरातील कृष्णा अर्बन बँकेच्या दारातच एसीच्या ग्रीलला गळफास घेऊन एका शिक्षकाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज,शनिवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे.शिक्षकाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!