Friday, April 17, 2026
Homeकोरचीग्रामपंचायत स्तरावरील अतिक्रमण धारकांची संख्या बळावली -पदाधिकारी हताश तर नागरिक त्रस्त

ग्रामपंचायत स्तरावरील अतिक्रमण धारकांची संख्या बळावली -पदाधिकारी हताश तर नागरिक त्रस्त

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

कोरची :- शासकीय,निमशासकीय खुल्या जागेवर व मुख्य रस्त्यांवर ग्रामपंचायत स्तरावरील ग्रामीण भागात अतिक्रमण वाढतच चालले आहे.अतिक्रमण धारकांमुळे ग्रामपंचायत पदाधिकारी व गावातील नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे.

ग्रामपंचायत पदाधिकारी गावातील खुल्या जागेवर,मुख्य रस्त्यांवर अतिक्रमण केलेल्या नागरिकांना वारंवार सूचना व नोटीस बजावूनही अतिक्रमणधारक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांपुढे अतिक्रमण काढण्यासंदर्भात मोठे आव्हान उभे राहिले आहे.ग्रामीण भागात गावातील नागरिक ये-जा करणाऱ्या मुख्य रस्त्यांवर साहित्य ठेवणे,गायी, म्हशी,गुरे-ढोरे बांधणे व लाकूड फाटा ठेवत असल्याने नागरिकांना आवागमन करण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे.काही दुकान चालक रस्त्यावरच व्यवसाय करीत असल्याने वाहनधारकांना वाहने चालवीतांना मनस्ताप होत आहे.मुख्य रस्ता कमी तर अतिक्रमण जास्त अशी अवस्था झाली आहे. 

गावातील काही बलाढ्य पैसेधारक पैस्याच्या जोरावर चक्क शासकीय जागेवरच अतिक्रमण करून बसले आहेत.खुली जागा दिसली की त्यावर सहजरित्या ताबा मिळवून आपली जागा असल्याचा पावित्रा घेतला जात आहे.ग्रामपंचायत रेकॉर्डमध्ये नोंद नसतांनाही जागेवर अवैधरित्या बांधकाम करण्याचा सपाटा सुरू आहे.ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना न जुमानता ग्रामीण भागात आपल्याच मनाचा कारभार सुरू असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.यासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी,सचिव यांनी वरिष्ठ स्तरावरुन अतिक्रमण धारकांविरोधात धडक मोहीम राबविणे गरजेचे असल्याचे जनसमान्यांतुन बोलल्या जात आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विद्यार्थ्यांसह नागरिकांसाठी राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा; प्रथम बक्षीस ३१ हजार रुपये..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कौशल्य,रोजगार व उद्योजकता,नाविन्यता विभागामार्फत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती प्रीत्यर्थ राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.या स्पर्धेत राज्यभरातील विद्यार्थी...

कामगारांसाठी दिलासादायक निर्णय; आता गोण्यांचे वजन राहणार ५० किलोपर्यंतच..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-डोक्यावर,पाठीवर ओझे वाहून नेणारे, अंगमेहनतीची कामे करणारे कामगार म्हणजेच माथाडी(हमाल)कामगारांना दररोज जड गोण्या(पोते) उचलण्याचे काम करावे लागते.धान,कांदा,बटाटा आणि इतर शेतमालाच्या व्यवहारात अनेक...

आज प्रोजेक्ट ‘उडान’ अंतर्गत १ हजार २७८ युवकांना रोजगार.. -नक्षलवाद विरोधी अभियानासाठी ३१ चारचाकी वाहनांचे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आधुनिक युगाच्या बदलत्या गरजेनुसार युवकांनी शिक्षणासोबत तांत्रिक कौशल्य आत्मसात करून स्वतःमध्ये आवश्यक बदल घडवून आणावेत, असे आवाहन राज्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल...

चार शाळकरी मुलांचा खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नांदेड :-शाळेची सुट्टी झाल्यानंतर घराकडे परतणाऱ्या चार अल्पवयीन शाळकरी मुलांनी रत्याच्या कडेला असलेल्या मार्गावरील खड्ड्यातील पाण्यात उतरून आंघोळ करत असतांनाच खोल पाण्याचा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!