Tuesday, July 28, 2026
Homeकोरचीग्रामपंचायत स्तरावरील अतिक्रमण धारकांची संख्या बळावली -पदाधिकारी हताश तर नागरिक त्रस्त

ग्रामपंचायत स्तरावरील अतिक्रमण धारकांची संख्या बळावली -पदाधिकारी हताश तर नागरिक त्रस्त

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

कोरची :- शासकीय,निमशासकीय खुल्या जागेवर व मुख्य रस्त्यांवर ग्रामपंचायत स्तरावरील ग्रामीण भागात अतिक्रमण वाढतच चालले आहे.अतिक्रमण धारकांमुळे ग्रामपंचायत पदाधिकारी व गावातील नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे.

ग्रामपंचायत पदाधिकारी गावातील खुल्या जागेवर,मुख्य रस्त्यांवर अतिक्रमण केलेल्या नागरिकांना वारंवार सूचना व नोटीस बजावूनही अतिक्रमणधारक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांपुढे अतिक्रमण काढण्यासंदर्भात मोठे आव्हान उभे राहिले आहे.ग्रामीण भागात गावातील नागरिक ये-जा करणाऱ्या मुख्य रस्त्यांवर साहित्य ठेवणे,गायी, म्हशी,गुरे-ढोरे बांधणे व लाकूड फाटा ठेवत असल्याने नागरिकांना आवागमन करण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे.काही दुकान चालक रस्त्यावरच व्यवसाय करीत असल्याने वाहनधारकांना वाहने चालवीतांना मनस्ताप होत आहे.मुख्य रस्ता कमी तर अतिक्रमण जास्त अशी अवस्था झाली आहे. 

गावातील काही बलाढ्य पैसेधारक पैस्याच्या जोरावर चक्क शासकीय जागेवरच अतिक्रमण करून बसले आहेत.खुली जागा दिसली की त्यावर सहजरित्या ताबा मिळवून आपली जागा असल्याचा पावित्रा घेतला जात आहे.ग्रामपंचायत रेकॉर्डमध्ये नोंद नसतांनाही जागेवर अवैधरित्या बांधकाम करण्याचा सपाटा सुरू आहे.ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना न जुमानता ग्रामीण भागात आपल्याच मनाचा कारभार सुरू असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.यासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी,सचिव यांनी वरिष्ठ स्तरावरुन अतिक्रमण धारकांविरोधात धडक मोहीम राबविणे गरजेचे असल्याचे जनसमान्यांतुन बोलल्या जात आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मुसळधार पावसाचा इशारा; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली/नागपूर :-भारतीय हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राने गडचिरोली जिल्ह्यासाठी उद्या,बुधवार २९ जुलै रोजी रेड अलर्ट तर ३० जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जारी...

उद्यापासून राज्याच्या विविध भागात वाढणार पावसाचा जोर; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांत उद्या,बुधवार २९ जुलै ते ३१ जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज...

पुलाचा कठडा तोडून कालव्यात कोसळली कार; एकाचा जागीच मृत्यू,तर तिघेजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-मुलगा व सुनेसोबत नातवाच्या भेटीसाठी गेलेल्या एका वृद्धेची नातवाची भेट ही अखेरची ठरल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा-आमगाव मार्गावरील हरदोली गावाजवळील पुलाजवळ...

आता १० रुपये व २० रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार चलनात.. – जुन्या कागदी नोटा बंद होणार काय?

उद्रेक न्युज वृत्त :-कागदी नोटांचा वापर अनेक ठिकाणी केला जातो.विशेषतः भाजीपाला,प्रवास आणि दैनंदिन खरेदीत कागदी नोटांचा वापर सातत्याने होत असल्याने कागदी नोटा खूप लवकर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!