Thursday, April 16, 2026
Homeकोरचीचिमुकलीचे हात-पाय बांधून अत्याचार करणाऱ्या नराधमास पोलीस कोठडी.. - कोरची तालुक्यातील घटना..

चिमुकलीचे हात-पाय बांधून अत्याचार करणाऱ्या नराधमास पोलीस कोठडी.. – कोरची तालुक्यातील घटना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कोरची(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या कोरची तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली असून एका ५१ वर्षाच्या नराधमाने अकरा वर्षीय चिमुकलीचे हात-पाय बांधून अत्याचार केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी म्हणजेच बुधवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडल्याने सर्वत्र संताप व्यक्त करण्यात आला.प्रकरणी पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून कोटगुल पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकून काल गुरुवारी न्यायालयात हजर केले असता,न्यायालयाने त्यास एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. धरमसिंग राजाराम कोरेटी वय ५१ वर्षे असे नराधम आरोपीचे नाव आहे.
कोरची तालुक्यातील नराधम आरोपी धरमसिंग याने अकरा वर्षीय चिमुकलीला बुधवारी दुपारच्या सुमारास घरात बोलावले.घरात बोलावून तिचे हात-पाय बांधून  अत्याचार केला व घटनेबाबत कुठे वाच्यता केल्यास
जीवे मारण्याची धमकी दिली.घडलेल्या प्रकाराबाबत चिमुकलीने आईला सांगताच पायाखालची जमीनच सरकली.लागलीच पीडितेच्या आईने कोटगुल पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली.प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता कोटगुल पोलिसांनी नराधमास अटक करून न्यायालयात हजर केले.आरोपीने यापूर्वीही पीडितेसोबत जवळीक साधून अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक बाब तपासात समोर आली आहे. पोलिसांनी पोलीस कोठडी मागताच आरोपीस एक दिवसाची कोठडी देण्यात आली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला...

आता प्रत्येक लाभार्थी कुटुंबास मिळणार तीन लिटर रॉकेल..

उद्रेक न्युज वृत्त :-जमाना कितीही बदलला तरीही 'जुनं ते सोनं' अशी अवस्था केवळ आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!