Thursday, April 16, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्त१४ हजार २३७ ग्रामपंचायतींवर येणार प्रशासक राज..

१४ हजार २३७ ग्रामपंचायतींवर येणार प्रशासक राज..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लांबणीवर गेल्या आहेत.अश्यातच राज्यातील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ येत्या फेब्रुवारी महिन्यात संपुष्टात येणार आहे.त्यातच,कार्यकाळ संपणाऱ्या राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका किमान सहा महिने तरी होणार नाहीत.त्यामुळे जानेवारी २०२६ पासून डिसेंबर २०२६ पर्यंतच्या काळात कार्यकाळ संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमणूक करण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने नुकतेच काढले आहे.यावर १४ ऑगस्ट २०२० च्या शासन आदेशानुसार प्रशासकाची नियुक्ती होणार आहे.तसे आदेश ग्रामविकास विभागाचे अप्पर सचिवांनी काढले असून जिल्हापरिषद मुख्यकार्यकारी अधिकारी व  जिल्हाधिकाऱ्यांना निर्गमित करण्यात आले आहेत.त्यानुसार,राज्यातील तब्बल १४ हजार २३७ ग्रामपंचायतींवर प्रशासक राज येणार आहे.यात नागपूर विभागातील १ हजार ५०८ ग्रामपंचायती,पुणे विभागात २ हजार ८७० ग्रामपंचायती,अमरावती विभागात २ हजार ४५१ ग्रामपंचायती,नाशिक विभागात २ हजार ४७६ ग्रामपंचायती,छत्रपती संभाजीनगर विभागात ४ हजार १३४ ग्रामपंचायती तर कोकण विभागातील ७९८ असे एकूण १४ हजार २३७ ग्रामपंचायतींचा कारभार प्रशासकाकडे जाणार आहे.विशेष म्हणजे,शासन अधिकारी,कर्मचाऱ्यांकडे कारभार सोपविणार आहे; तर दुसरीकडे गावगाडा हाकणारी संघटना सरपंच तसेच ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनाच प्रशासक नेमण्याची मागणी करीत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला...

आता प्रत्येक लाभार्थी कुटुंबास मिळणार तीन लिटर रॉकेल..

उद्रेक न्युज वृत्त :-जमाना कितीही बदलला तरीही 'जुनं ते सोनं' अशी अवस्था केवळ आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!