Sunday, May 31, 2026
Homeकुरखेडागोठ्यात बांधलेल्या गायीवर वाघाने चढविला हल्ला- कुरखेडा तालुक्यातील आंधळी- नवरगाव येथील घटना

गोठ्यात बांधलेल्या गायीवर वाघाने चढविला हल्ला- कुरखेडा तालुक्यातील आंधळी- नवरगाव येथील घटना

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

कुरखेडा :- तालुक्यातीलआंधळी-नवरगाव येथे गुरुवारी पहाटेच्या सुमारास गोठ्यात बांधलेल्या गायीवर वाघाने हल्ला चढविल्याचे प्रत्यक्षदर्शी गावातील नागरिकांनी बघितले असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

तालुक्यातील खरमतटोला,अरततोंडी व आंधळी-नवरगाव गावा नजिक संपूर्ण आजूबाजूचा परिसर जंगल व्याप्त असल्याने वन्य प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर आढळून येतो.आंधळी-नवरगाव शेतकरी येथील प्रकाश कवाडकर हे नेहमीप्रमाणे पशुंना गोठ्यात बांधून रात्रीच्या सुमारास झोपी गेले होते.अशातच दरम्यान जंगलातून वाघाने थेट गावात प्रवेश करीत कवाडकर यांच्या गोठ्याच्या दिशेने मोर्चा वळविला. यावेळी वाघाने बांधलेल्या अवस्थेत असलेल्या गायीवर हल्ला चढविला.मात्र वाघापेक्षा मोठी असलेल्या गायीने प्रतिकार केला.दरम्यान घराशेजारच्या नागरिकांना याची चाहूल लागताच कवाडकर यांच्या गोठ्याकडे बघितले असताना वाघ व गायींमध्ये संघर्ष सुरू असल्याचे निदर्शनास आले. नागरिकांनी व पशुपालक कवाडकर यांनी आरडाओरड केल्याने वाघ जंगलाच्या दिशेने पसार झाला.

गावातील नागरिकांच्या मते,काही दिवसांपासून वाघ गावामध्ये येत असल्याने जनावरांसह गावातील नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.त्याकरिता वन विभागाने वन्य जीव व मानवी संघर्ष टाळण्याकरिता वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा.अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तरुणाने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-एका ३६ वर्षीय विवाहित तरुणाने राहत्या घरीच गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची घटना आज,रविवार ३१ मे रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा शहरातील...

विवाहित महिलेचा गळा चिरून हत्या करणारा आरोपी अटकेत.. – क्षुल्लकशा कारणावरून हत्या; बालपणापासून होते प्रेमप्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातील वेकोलिच्या धोपटाळा कामगार वसाहतीत एका विवाहित महिलेची धारदार शस्त्राने गळा चिरून निघृण हत्या करण्यात आल्याची थरारक घटना शुक्रवार...

धानोरा व एटापल्ली तालुक्यात २० हजार धुररहित चुलींचे वितरण.. -दरवर्षी ४१ हजार टनांहून अधिक जळाऊ लाकडाची होणार बचत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शन व पुढाकारातून गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा व एटापल्ली या दुर्गम,आदिवासी तालुक्यांमध्ये राबविण्यात आलेल्या धुररहित चुल उपक्रमाला उल्लेखनीय...

चार दिवसांत उष्माघाताचे तब्बल १८ जण बळी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सध्या नवतपाचे दिवस सुरू आहेत.२५ मे २०२६ पासून सुरू झालेली सूर्याची दाहकता २ जून २०२६ पर्यंत राहणार आहे.अश्यातच भयंकर तापणाऱ्या नवतप्याने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!