- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-देशात स्वयंपाकाच्या गॅस संकटाची परिस्थिती भयावह होत चालली आहे.सरकार गॅसची टंचाई केवळ अफवा असल्याचे सांगत ही स्थिती हाताळण्यासाठी ५० हजार कोटींचा अतिरिक्त निधी ठेवण्याची भाषा करत असले,तरी वस्तुस्थिती फार वेगळी आहे.पंजाबच्या बर्नाला येथे गॅससाठी रांगेत उभ्या असलेल्या एका वृद्धाच्या मृत्यूनंतर,आता उत्तर प्रदेशातील फरुखाबादमध्ये ७६ वर्षांचे मोहम्मद मुख्तियार यांनी सकाळी साडे सहा वाजता रांगेत उभे असतांनाच प्राण गमावले.या दोन्ही वृद्धांचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाला आहे.हजारो हॉटेल्स, रेस्टॉरंट्स,शाळांचे मेस आणि हायकोर्टाचे किचन बंद झाल्यानंतर आता गॅस टंचाई संसदेपर्यंत पोहोचली आहे.काँग्रेस खासदार मोहम्मद जावेद यांनी दावा केला की,देशात गॅसची कमतरता आहे,यात शंका नाही.मी रोजा ठेवत आहे,पण संसदेत चर्चेचा विषय हा होता की,जेव्हा खासदारांनी संसद कॅन्टीनमध्ये चहा किंवा कॉफी मागितली,तेव्हा ती उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले.तरीही सरकार दावा करत आहे की घाबरण्याचे कारण नाही.
अमृतसरमधील इस्लामाबाद येथील ‘देश भगत गॅस एजन्सी’मध्ये सिलिंडरवरून मॅनेजर आणि ग्राहकामध्ये जोरदार भांडण झाले.गॅस न मिळाल्याने हतबल झालेली एक वृद्ध महिला एजन्सीबाहेरच ढसाढसा रडू लागली,ज्यामुळे लोकांचा संताप अनावर झाला आणि त्यानी एजन्सीमध्ये तोडफोड केली. या महिलेला सहा तास रांगेत उभे राहूनही सिलिंडर मिळाले नव्हते. लुधियानात तर सिलिंडर घेऊन घरी परतणाऱ्या एका व्यक्तीकडून दुचाकीस्वार तरुणांनी भररस्त्यात सिलिंडर हिसकावून नेल्याची घटना घडली.केंद्र सरकारने व्यावसायिक एलपीजी सिलिडरवरील बंदी उठवली आहे.पेट्रोलियम मंत्रालयाने शनिवारी जाहीर केले की २९ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये व्यावसायिक सिलिंडरचे वितरण पुन्हा सुरू झाले आहे.सरकारने ९ मार्च रोजी व्यावसायिक सिलिंडरच्या पुरवठ्यावर बंदी घातली होती.
- Advertisement -

