- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-राज्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक राज येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले असतांनाच शासनाने सर्वांचा करेक्ट कार्यक्रम करून गावगाडा हाकणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा गुलाल उधळला आहे.जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती व नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग म्हणजेच वॉर्ड रचनेचा अधिकृत कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे.ग्रामविकास विभागाच्या सहसचिव वर्षा भरोसे यांनी यासंदर्भात आज,मंगळवार १७ फेब्रुवारीला आदेश जारी केला आहे.
पहिल्या टप्प्यात तहसीलदार ‘गुगल अर्थ’च्या साहाय्याने २० फेब्रुवारीपर्यंत गावांचे नकाशे अंतिम करतील. त्यानंतर,दुसऱ्या टप्प्यात २७ फेब्रुवारीपर्यंत संबंधित तलाठी आणि ग्रामसेवक प्रभागांच्या सीमा निश्चित करतील.तिसऱ्या टप्प्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या तपासणीनंतर २३ मार्च २०२६ पर्यंत राज्य निवडणूक आयोग या प्रस्तावांना अंतिम मान्यता देईल.७ एप्रिल २०२६ रोजी प्रभाग रचनेचा मसुदा(प्रारूप) जाहीर केला जाईल.नागरिकांना ७ ते १३ एप्रिल २०२६ या कालावधीत आपल्या हरकती किंवा सूचना नोंदवता येतील.प्राप्त झालेल्या हरकतींवर २१ एप्रिलपर्यंत उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सुनावणी पार पडेल.
सर्व हरकतींचा निपटारा केल्यानंतर आणि प्रस्तावांची पडताळणी पूर्ण झाल्यावर,जिल्हाधिकारी २८ एप्रिलपर्यंत अंतिम प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करतील.त्यानंतर,४ मे २०२६ रोजी अधिकृतरीत्या अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाणार आहे.यानंतर ग्रामपंचायत निवडणूकीचा धुराळा उडणार आहे.
- Advertisement -

