उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज :- कित्तेक वर्षांपासून शासकीय कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र सरकार अन्याय करीत असल्याने राज्यभरातील सरकारी कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करावी; या मागणीला घेऊन काल १४ मार्च २०२३ पासून राज्यभरात आंदोलन पुकारित संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.आम आदमी पार्टीचा सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागणीला आणि आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा असल्याचे आम आदमी पक्षाचे गडचिरोली जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश जीवानी यांनी कळविले आहे.
पंजाबमध्ये निवडणुकीच्या वेळी आम आदमी पक्षाने सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना पूर्ववत करण्याच्या आश्वासन दिले होते.सत्तेत येताच पंजाबमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.पंजाब सरकारच्या या निर्णयाचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सुद्धा कौतुक केले होते.२००५ नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना नवी राष्ट्रीय निवृत्तीवेतन पद्धती लागू करण्यात आली.या योजने अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या पगारातून कापलेली काही रक्कम शेअर बाजारात गुंतवली जाते.त्यामुळे निवृत्ती पश्चात मिळू शकणारा लाभ हा त्या-त्या समयीच्या बाजार स्थितीनुरूप बदलतो.त्यामुळे या नव्या पेन्शन योजनेला कर्मचाऱ्यांकडे दिवसेंदिवस विरोध तीव्र होत आहे.त्यामुळे जुन्या पेन्शनसाठी पुकारलेल्या मागणीला गडचिरोली आम आदमी पक्षाचा जाहीर पाठिंबा असल्याचे आपचे गडचिरोली जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश जीवानी यांनी म्हटले आहे.जुनी पेन्शन योजनेच्या पाठिंबा निमित्ताने आम आदमी पक्षाचे संपूर्ण कार्यकर्ते देसाईगंज येथे एकत्र गोळा होऊन घोषणेच्या माध्यमातून पाठिंब्याचे समर्थन करतांना दिसून आले.