Wednesday, June 10, 2026
Homeनागपूर'खर्रा दे.!' म्हणत हातातील लोखंडी कड्याने प्रहार; १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू..

‘खर्रा दे.!’ म्हणत हातातील लोखंडी कड्याने प्रहार; १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-शहरी भागासह ग्रामीण भागात खर्रा खाणाऱ्यांचे प्रमाण अधिक वाढले आहे.मात्र,हाच खर्रा एका १८ वर्षीय तरुणाच्या जीवावर बेतला असल्याची घटना नुकतीच नागपूर शहराच्या अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे.चक्क ‘खर्रा दे.!’ म्हणत खर्रा न दिल्यामुळे वस्तीत राहणाऱ्या आरोपी युवकाने हातातील लोखंडी कड्याने डोक्यावर प्रहार केल्याने एका युवकाचा मृत्यू झाला आहे.आर्यन विलास वहिले वय १८ वर्षे,रा.गल्ली नं.१०, विश्वकर्मानगर,नागपूर असे मृत युवकाचे नाव असून तो डेकोरेशनचे काम करीत होता.तर राहुल श्याम हजारे वय २४ वर्षे,रा.गल्ली नं.९,विश्वकर्मानगर, नागपूर असे आरोपीचे नाव आहे.आर्यन आठ दिवसांपासून घरी गेला नव्हता.तो १० जूनला अजनी रोडवरील फुटपाथवर झोपलेल्या अवस्थेत आढळल्याने त्याचे वडील विलास वहिले व मित्राने त्याला घरी नेले.नारळ पाणी घेऊन तो झोपला होता.अश्यातच रात्री ९ वाजेच्या सुमारास त्याची प्रकृती बिघडल्याने त्यास मेडिकलमध्ये उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.याप्रकरणी आर्यनचे वडील विलास वहिले यांच्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती.दरम्यान,आर्यनच्या शवविच्छेदन अहवालात त्याचा मृत्यू हेड इन्ज्युरीमुळे झाल्याचे उघड झाले.आर्यनचा मित्र राहुलने हातातील लोखंडी कड्याने डोक्यावर मारहाण केल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांना सांगितले.त्यावरून अजनी ठाण्याचे उपनिरीक्षक सिद्धांत मस्के यांनी आरोपी राहुल हजारे विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.इवल्याश्या क्षुल्लक कारणावरून १८ वर्षीय आर्यनचा मृत्यू झाल्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर ‘त्या’ शेतकऱ्यास मदतीचा हात; मुख्यमंत्र्यांकडून दखल..

उद्रेक न्युज वृत्त  लातूर :-जिल्ह्याच्या देवणी तालुक्यातील बोंबळी खुर्द येथील शेतकरी काशिनाथ गायकवाड यांच्यावर काही दिवसांपूर्वी दुहेरी संकट ओढवले होते.शेतातील मशागतीची कामे सुरू असतांनाच वादळी...

विदर्भातील शाळांसाठी दिलासादायक निर्णय; शाळा सुरू करण्यास सात दिवसांची मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्याच्या विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम असल्याने राज्य शिक्षण विभागाने दिलासादायक निर्णय घेतला आहे.नियोजित वेळापत्रकानुसार १५...

दुर्गम गडचिरोलीतील तब्बल ७८ विद्यार्थ्यांना देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुर्गम,नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात आलेला ‘मिशन-२००’ हा उपक्रम...

अखेर नदीत बुडालेल्या तीन तरुणांचे सापडले मृतदेह; उर्वरित दोन युवकांचा शोध सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या घुग्गुस शहरातील पाच तरुण म्हातारदेवी परिसरातील वर्धा नदीवर पोहण्यासाठी गेले असता काल सोमवारच्या रात्री उशिरापर्यंत घरी परतले नसल्याने नदीत बुडाल्याची भीती...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!