Tuesday, July 7, 2026
Homeकुरुडकुरुड ग्रामपंचायतीचे उपसरपंच क्षितीज उके यांचा नवा आदर्श; - पाच वर्षाचे मानधन शासनास...

कुरुड ग्रामपंचायतीचे उपसरपंच क्षितीज उके यांचा नवा आदर्श; – पाच वर्षाचे मानधन शासनास दिले परत……

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

कुरुड :-देसाईगंज तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या कुरुड ग्रामपंचायतीचे उपसरपंच तथा देसाईगंज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष क्षितिज उके यांनी ग्रामपंचायतीमध्ये निवडून आल्यानंतर पाच वर्षात मिळणारे संपूर्ण मानधन शासनास परत दिले असल्याने गावातच नव्हे तर संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात एक नवा आदर्श ठेवला आहे.

जिल्ह्यात २०२१ मध्ये ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या; कुरुड ग्रामपंचायतीमध्ये क्षितीज उके यांनी पहिल्यांदाच आपले पॅनल तयार करून निवडणूक लढविली होती.निवडणुकांचा निकाल जाहीर होताच उके यांच्या पॅनलने बहुमत सिद्ध करून ग्रामपंचायतीमध्ये सत्ता काबीज केली.कुरुड ग्रामपंचायतीच्या तब्बल२५ वर्षाच्या कालावधीनंतर पहिल्यांदाच परिवर्तन घडून आले.देसाईगंज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तथा कुरुड ग्रामपंचायतीचे (हल्ली ) कार्यरत असणारे क्षितीज उके यांनी जनतेला दिलेली आश्वासने,जनसामान्यांचे प्रश्न,मन मिळावू स्वभाव,सर्वांना समजून घेणारे, विकासात्मक भूमिका घेणारे असे व्यक्तिमत्त्व असल्याने जनतेचा कौल मोठ्या प्रमाणावर गावातच नव्हे तर तालुक्यातही दिसून येतो.सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्यांना खोटे बोलणे वा ऐकून घेणे अजिबात आवडत नाही.

निवडून आल्यानंतर क्षितीज उके यांनी ग्रामपंचायत सभागृहात झालेल्या पहिल्याच मासिक सभेत सर्वांसमोर पत्राद्वारे लिहून दिले की मला पाच वर्षात शासनाकडून ग्रामपंचायत अंतर्गत मिळणारे  भत्ते,मानधन सर्व शासनास देत आहे.निवडणुकीचे तीन वर्षे लोटण्यास येत असूनही याबाबतीत गावातील नागरिकांना वा इतरत्र कुठेही त्यांनी कळू दिले नाही व तशी माहितीही होऊ दिली नाही.मात्र गुपितरीत्या माहिती घेतली असता सदर बाब निदर्शनास आली असल्याने क्षितीज उके यांचा नवा आदर्श दिसून येतो.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघांचे हल्ले काही केल्या थांबेना..! ऐन शेतीच्या हंगामातच वाघाने घेतला एकाचा जीव..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यातील खडसंगी (बफर)वनपरिक्षेत्र व प्रादेशिक वनक्षेत्राच्या सीमेलगतच्या बरडघाट शेतशिवारात वाघाने एका ५० वर्षीय शेतकऱ्यावर हल्ला चढवून जीव घेतल्याची घटना...

कृषी विभागामार्फत खरीप हंगाम-२०२६ साठी पीकस्पर्धेचे आयोजन.. – स्पर्धेतील विजेत्यांना तालुका,जिल्हा आणि राज्यस्तरावर प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांकाची बक्षिसे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील अन्नधान्य,कडधान्य व गळीतधान्य पिकांची उत्पादकता वाढविणे,प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे तसेच आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत खरीप हंगाम...

उद्यापासून गडचिरोली,आरमोरी व देसाईगंज येथे जादूटोणा विरोधी कायदा व अंधश्रद्धा निर्मूलनावर प्रबोधन कार्यक्रम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जादूटोणा विरोधी कायदा तसेच अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत समाजामध्ये जनजागृती व प्रबोधन व्हावे,या उद्देशाने गडचिरोली जिल्ह्यात विशेष प्रबोधन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या...

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात १५ दिवस मनाई आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ मधील कलम ३७(१)(३)अन्वये ५ जुलै २०२६ रोजी रात्री १२.०१ वाजल्यापासून ते १९...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!