उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(कुरुड) :-तरुणांनो चांगले व्यक्तिमत्त्व घडवायचे असेल तर परमार्थात या; ही काळाची गरज आहे.जर मॉ.जिजाऊ यांनी शिवाजी महाराजांवर योग्य संस्कार केले नसते तर छत्रपती शिवाजी महाराज घडले नसते.आपले आदर्श स्वामी विवेकानंद भगतसिंग हे ठेवा; असे प्रतिपादन हरिभक्त परायण कुमारी लीना बागडे महाराज यांनी भागवत कथेच्या माध्यमातून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
श्री गजानन महाराज प्रगट दिन उत्सवानिमित्त आयोजित भागवत कथेवर त्यांनी भाष्य केले.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व गाडगेबाबा यांनी समाजाला नवीन विचार दिले असे हरिभक्त परायण लीना बागडे महाराज यांच्या अमृतवाणीतून अगदी साध्या आणि सोप्या भाषेत भाविकांना संबोधित केले.या भागवत कथेला बहुसंख्य भाविक उपस्थित होते. कार्यक्रमांमध्ये विशेष आकर्षण गोवर्धन पूजा भगवान श्रीकृष्णाचे जीवन,वर्णन व आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले.
उद्या रविवार दिनांक ३ मार्च ला श्री संत गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त गोपाल काल्याचे आयोजन करण्यात आले आहे.भाविकांनी या काल्याचे लाभ घेण्याचे आवाहन आयोजक समिती पाटील मोहल्ला कुरूड यांनी केले आहे.

