Wednesday, April 23, 2025
Homeगडचिरोलीकाँग्रेसच्या आंदोलनास यश..! अखेर आज गोसीखुर्द धरणातून वैनगंगा नदीपात्रात पाणी सोडले.....
spot_img

काँग्रेसच्या आंदोलनास यश..! अखेर आज गोसीखुर्द धरणातून वैनगंगा नदीपात्रात पाणी सोडले.. – नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-नुकतेच चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात वाढत्या पाणीटंचाईवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गडचिरोली जिल्ह्याच्या वैनगंगा नदी पात्रात ५ एप्रिल २०२५ रोजी भर उन्हात काँग्रेस पक्षाच्या वतीने पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी तीव्र ठिय्या आंदोलन केले होते.सदरचे आंदोलन हे भंडारा जिल्ह्याच्या गोसेखुर्द धरणातून वैनगंगा नदी पात्रात तातडीने पाणी सोडण्याच्या मागणीसाठी करण्यात आले होते.सदरच्या आंदोलनास यश आल्याचे दिसून येत आहे.अखेर आज,शनिवार १२ एप्रिल रोजी गोसीखुर्द धरणातून वैनगंगा नदीपात्रात ४० कुमेक्सने  पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला असून नदीकाठच्या गावांतील नागरिक,शेतकरी व मत्स्यव्यावसायिक यांना गडचिरोली आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.वैनगंगा नदीकिनारी असलेले देसाईगंज(वडसा), आरमोरी व चामोर्शी तालुक्यांतील सर्व गावांमध्ये तलाठी व कोतवाल यांच्या माध्यमातून नागरिकांना सावध करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.नदीपात्रात शेती करणारे शेतकरी,मासेमारी करणारे,नदीकिनारी पाणी पिण्यासाठी गुरे नेणारे नागरिक तसेच पूल,रस्ते बांधकाम करणाऱ्या नागरिकांनी
खबरदारी घ्यावी,असेही आवाहन करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -
spot_imgspot_img

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर आज यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर; शक्ती दुबे देशात पहिली..

उद्रेक न्युज वृत्त :-भारतातील सर्वात कठीण परीक्षा म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा म्हणजेच यूपीएससी.परीक्षा पास होण्यासाठी विद्यार्थी जीवाचे रान करून नशीब अजमावू पाहतात.यंदाच्या यूपीएससी...

पर्यटकांना नाव आणि धर्म विचारत दहशतवाद्यांचा अंधाधुंद गोळीबार; २० जणांचा मृत्यू झाल्याची भीती..

उद्रेक न्युज वृत्त :-जम्मू-काश्मीरच्या पहलगामपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या प्रसिद्ध पर्यटन स्थळ बैसरन व्हॅली येथे आज,मंगळवारी २२ एप्रिलला दुपारी अडीच वाजेच्या सुमारास बैसरन मैदानावर ...

आता चंद्रपूर जिल्हा परिषदेचे नवे सिईओ पुलकित सिंग तर विवेक जॉन्सन बीडचे जिल्हाधिकारी.. – राज्यातील पाच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील बदल्यांचे सत्र संपता-संपेना..! राज्य सरकारकडून आतापर्यंत अनेक सनदी अधिकाऱ्यांच्या(IAS) बदल्या करण्यात आल्या आहेत.अशातच आज,मंगळवार २२ एप्रिलला राज्यातील पाच आयएएस...

मित्राला सोडून देण्यासाठी देसाईगंजला गेलेल्या ब्रम्हपुरीच्या तरुणाची वैनगंगा नदीत उडी…

उद्रेक न्युज  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या ब्रम्हपुरी शहरात वास्तव्यास असणारा २२ वर्षीय तरुण मित्राला सोडून देण्यासाठी दुचाकीने देसाईगंजला(वडसा)गेला.मात्र,परतीच्या वाटेवर असणाऱ्या देसाईगंज-ब्रम्हपुरी मार्गावरील वैनगंगा नदीत उडी घेऊन जीवनयात्रा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!