Monday, December 15, 2025
Homeगडचिरोलीकाँग्रेसच्या आंदोलनास यश..! अखेर आज गोसीखुर्द धरणातून वैनगंगा नदीपात्रात पाणी सोडले.....

काँग्रेसच्या आंदोलनास यश..! अखेर आज गोसीखुर्द धरणातून वैनगंगा नदीपात्रात पाणी सोडले.. – नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-नुकतेच चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात वाढत्या पाणीटंचाईवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गडचिरोली जिल्ह्याच्या वैनगंगा नदी पात्रात ५ एप्रिल २०२५ रोजी भर उन्हात काँग्रेस पक्षाच्या वतीने पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी तीव्र ठिय्या आंदोलन केले होते.सदरचे आंदोलन हे भंडारा जिल्ह्याच्या गोसेखुर्द धरणातून वैनगंगा नदी पात्रात तातडीने पाणी सोडण्याच्या मागणीसाठी करण्यात आले होते.सदरच्या आंदोलनास यश आल्याचे दिसून येत आहे.अखेर आज,शनिवार १२ एप्रिल रोजी गोसीखुर्द धरणातून वैनगंगा नदीपात्रात ४० कुमेक्सने  पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला असून नदीकाठच्या गावांतील नागरिक,शेतकरी व मत्स्यव्यावसायिक यांना गडचिरोली आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.वैनगंगा नदीकिनारी असलेले देसाईगंज(वडसा), आरमोरी व चामोर्शी तालुक्यांतील सर्व गावांमध्ये तलाठी व कोतवाल यांच्या माध्यमातून नागरिकांना सावध करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.नदीपात्रात शेती करणारे शेतकरी,मासेमारी करणारे,नदीकिनारी पाणी पिण्यासाठी गुरे नेणारे नागरिक तसेच पूल,रस्ते बांधकाम करणाऱ्या नागरिकांनी
खबरदारी घ्यावी,असेही आवाहन करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

रेतीच्या एका ट्रकमुळे उचलबांगडी..! ब्रम्हपुरी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांची होणार विभागीय चौकशी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एखाद्याची उचलबांगडी करायची झाली तर अनेकजण त्या व्यक्तीच्या मागे हात धुऊन लागत असतात.नाहीतर कितीतरी तक्रारी वा प्रकरणे आजही कार्यालयात धूळ खात...

आमदार विरोधात बातमी भोवली; हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल.. चार पत्रकारांना पाच दिवसाचा कारावास..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एखादी बातमी वा वृत्त प्रसारित करतांना त्यातील तथ्य तसेच सत्यता तपासणे हे प्रत्येक पत्रकारांचे काम आहे.मात्र,काहीजण याचे उल्लंघन करून एखाद्याची नाहक...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी.. अर्ज भरतांना किंवा ई-केवायसी करतांना झालेल्या चुका सुधारण्यासाठी संधी..

उद्रेक न्युज वृत्त :-'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना' ही राज्य सरकारची अत्यंत लोकप्रिय आणि महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेचा लाभ घेणाऱ्या बहुतांश लाभार्थी महिला या...

किती हे हल्ले म्हणावे..! वाघाने घेतला महिलेचा जीव..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष दिवसेंदिवस वाढू लागला आहे.विदर्भातील एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात ३९ वा तर वाघाच्या हल्ल्यातील ३७ वा बळी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!