उद्रेक न्युज वृत्त :-शासकीय कार्यालयात असो वा खासगी कामाकरीता,बँक खात्यापासून ते शैक्षणिक क्षेत्रात इतर दस्तऐवजांसह आधार कार्डला सगळीकडेच मोठे महत्व प्राप्त झाले आहे.आधार कार्ड शिवाय कुठलेही काम हे अपूर्णच म्हणावे लागेल.अशातच कित्तेक वर्षांपासून आधार केंद्र चालक तुटपुंज्या मानधनावर काम करीत होते.त्यामुळे सदरची बाब शासनाच्या लक्षात येताच आधार केंद्र चालकांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे. आधार केंद्र चालकांना शासनाच्या वतीने पूर्वी एका आधार नोंदणीसाठी २० रुपये देण्यात येत होते,तर आता एका आधार नोंदणीसाठी ५० रुपये देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे.राज्यात १२ कोटी ८० लाख आधार कार्ड नोंदणी पूर्ण झाली असून ० ते ५ वयोगटातील बालकांची नोंदणी ३९ टक्के झाली आहे.तर ५ ते १७ वर्षे वयोगटातील मुला-मुलींची आधार बायोमेट्रिक करण्यात फारशी प्रगती झाली नसल्याने या वयोगटाच्या नोंदणीत वाढ करण्यासाठी ३ महिन्यात उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या आधार केंद्र चालकांना बक्षीस योजना जाहीर करण्यात आली असल्याचे मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले आहे.
आनंदाची बातमी.. आधार केंद्र चालकांच्या मानधनात वाढ..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक


सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES