उद्रेक न्युज वृत्त :-राज्याच्या शाळा शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी हजेरदारीसंदर्भात नवीन आदेश जाहीर केले आहेत.त्यानुसार,विद्यार्थ्यांनी दिवसातून तीन वेळा म्हणजे सकाळी,दुपारी आणि संध्याकाळी असे उपस्थितीत राहावे लागणार आहे. जर एखादा विद्यार्थी अनुपस्थित राहिला,तर त्याच्या पालकांना तात्काळ एसएमएसद्वारे माहिती देण्यात येईल.शाळांमध्ये वर्गाच्या दरवाजे,कॉरिडोर,मुख्य प्रवेशद्वारे,खेळाच्या मैदानासमोर आणि शौचालयाच्या बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे लावणे अनिवार्य करण्यात आले असून,एका महिन्याचा व्हिडीओ बॅकअप ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची नियुक्ती होण्यापूर्वी पोलिसांकडून पात्रता प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे; जर त्यांचा कोणताही गुन्हेगारी इतिहास असेल तर त्यांची सेवा ताबडतोब समाप्त करण्यात यावी,असे सांगितले आहे.मुलांसाठी आणि मुलींसाठी वेगळे शौचालय असावेत,प्रत्येक शौचालयाजवळ परिचारक नियुक्त केले जावेत तसेच पाणी,प्रकाश आणि आपत्कालीन घंटी उपलब्ध असावीत,असेही निर्देश आहेत.व्हिडीओ बॅकअप ठेवण्याचे आदेश शाळांमध्ये वर्गाच्या दरवाजे,कॉरिडोर, मुख्य प्रवेशद्वारे,मैदान आणि शौचालयांच्या बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे लावणे अनिवार्य केले गेले आहे.एक महिन्याचा व्हिडीओ बॅकअप ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
आता विद्यार्थ्यांना सकाळी,दुपारी आणि संध्याकाळी म्हणावे लागेल हजर गुरुजी..!
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

