Sunday, April 19, 2026
Homeनवी दिल्लीआता बंद असलेल्या मोबाइल सिम कार्डवर आकारले जाणार शुल्क…

आता बंद असलेल्या मोबाइल सिम कार्डवर आकारले जाणार शुल्क…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नवी दिल्ली :- देशात सध्या मोबाइल नंबर मिळण्याची समस्या निर्माण झाली आहे.बहुतेक मोबाइल वापरकर्ते त्यांच्या स्मार्टफोनमध्ये दोन सिम कार्ड वापरतात.यामध्ये एक कार्ड चालू असते तर दुसऱ्याचा वापर खूपच मर्यादित होतो किंवा ते बंद राहते.तसेच काही वापरकर्ते एकापेक्षा जास्त मोबाइल सिम कार्ड वापरतात.त्यामुळे बंद असलेल्या मोबाइल क्रमांकावर शुल्क वसूल करण्याची योजना आखण्यात आली आहे.हे शुल्क एकरकमी किंवा वार्षिक आधारावर घेतले जाऊ शकते.ट्रायने मोबाइल फोन किंवा लैंडलाइन नंबरसाठी मोबाइल ऑपरेटर्सकडून शुल्क आकारण्याची योजना तयार केली आहे.त्यामुळे कंपन्या हे शुल्क वापरकर्त्यांकडून वसूल करू शकतात.मोबाइल ऑपरेटर त्यांचा वापरकर्ता सोडून जाईल या भीतीमुळे बऱ्याच काळापासून बंद असलेली सिम कार्ड बंद करत नाहीत.नियमांनुसार सिम कार्ड दीर्घकाळ रिचार्ज न केल्यास ते काळ्या यादीत टाकण्याची तरतूद आहे.

आकडेवारीनुसार,सध्या २१.९१ कोटींहून अधिक मोबाइल नंबर काळ्या यादीत समाविष्ट आहेत; जे बऱ्याच काळापासून सक्रिय नाहीत.एकूण मोबाइल क्रमांकांपैकी हे प्रमाण सुमारे १९ टक्के आहे.सरकार स्वतः मोबाइल ऑपरेटरला मोबाइल नंबर सिरीज जारी करते.मोबाइल क्रमांक मर्यादित संख्येत उपलब्ध असल्याचे ट्रायचे म्हणणे आहे.अशा परिस्थितीत सिम कार्डचा योग्य वापर करणे गरजेचे झाले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच उडाला भडका; पतीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-स्वयंपाकघरातील गॅस लिकेज असल्याने चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच आगीचा अचानकपणे भडका उडाला आणि काही क्षणातच सिलिंडरचा जोरदार स्फोट झाला.दरम्यान,संपूर्ण घरात...

वाहनधारकांसाठी दिलासा; गडचिरोली शहरातील ट्रॅफिक सिग्नल काही वेळासाठी राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदर्भातीलच नव्हे तर राज्याच्या विविध जिल्ह्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने जीवाची लाहीलाही होत आहे.अश्यातच शहरातील महत्त्वाच्या...

उष्णतेची तीव्रता; प्रखर उन्हामुळे शेतातच पडली बेशुद्ध.. – शेतकरी महिलेचा मृत्यू; नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उष्णतेचा पारा चढल्याने आरोग्य विभागासह प्रशासन सतर्क झाले आहे.त्यातच,नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहे.विशेष म्हणजे,दुपारी १२...

कहाणीमध्ये ट्विस्ट.! ना वाघ ना बिबट्या; घातपाताचा संशय.. – जंगल परिसरात महिलेचा मृतदेह आढळल्याचे प्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्राच्या हरदोली सहवनक्षेत्रातील ३३६ कक्ष क्रमांकाच्या सोनेगाव बीट एकमध्ये बिबट्याने मोहफुले वेचत असणाऱ्या महिलेच्या मानेवर हल्ला चढवून ठार केल्याची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!