- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-राज्याच्या विविध जिल्ह्यातील अनेक रेशन कार्ड धारकांना वारंवार सूचना देऊनही अजूनपर्यंत अनेकांनी ई-केवायसी केलेली नाही.अशा कार्डधारकांनी १५ मार्चपर्यंत आपल्याच मोबाइलवरून आपले रेशन कार्ड ई-केवायसी करून घ्यावे अन्यथा राशन मिळणे बंद होऊ शकते,अशा सूचना करण्यात येत आहेत.
अनेक कार्डधारक नोकरी,व्यवसाय निमित्ताने बाहेरगावी राहत असल्याने अशा अनेक कुटुंबांना रेशन कार्ड असलेल्या गावात येता आले नाही.परंतु, आता ज्या शहर,गावात वास्तव्यात आहात त्याच गावातील रास्त भाव दुकानात जाऊन पॉस मशीनला थंब करण्याचीही गरज नाही.
‘मेरा ई-केवायसी ॲप’👇
आता केंद्र सरकारने सर्व रेशन कार्ड धारकांकरिता ‘मेरा ई-केवायसी ॲप’ सुरू केले आहे.हे ॲप मोबाइल मध्ये डाउनलोड करून उघडल्यावर त्यात कुटुंबातील सदस्यांचे आधार क्रमांक टाकावयाचे आहेत.त्यानंतर एक ओटीपी येईल.आलेला ओटीपी सबमिट केल्यानंतर ई-केवायसी पूर्ण होणार आहे.दिलेल्या सुविधेद्वारे १५ मार्चपूर्वी सर्व कार्डधारकांनी आपले कुटुंबातील सर्व सदस्यांचे ई-केवायसी करून घेणे अनिवार्य आहे.अन्यथा रेशन उचलण्यास अडथळा येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
- Advertisement -

