Saturday, March 15, 2025
Homeउद्रेक न्युज वृत्तअसेच सर्व सुरु राहिल्यावर राजकारणात राहायचं कशाला? - निवडणुक प्रकियेवर शंका उपस्थित...
spot_img

असेच सर्व सुरु राहिल्यावर राजकारणात राहायचं कशाला? – निवडणुक प्रकियेवर शंका उपस्थित करीत आमदार,उमेदवार जाणार कोर्टात- नाना पटोले

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल बघता निवडणुकीच्या प्रकियेवर शंका उपस्थित करीत निवडणूक आयोगाच्या व्यवस्थेवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज,गुरुवारी २८ नोव्हेंबरला संशय व्यक्त केला आहे.या विरोधात आमचे आमदार आणि उमेदवार कोर्टात जाणार आहेत; असे पटोले यांनी यावेळी सांगितले.
पटोले म्हणाले की,७.८७ टक्क्यांनी मतदानात वाढ झाली आहे.७६ लाख मते संध्याकाळी पाच सहाच्या दरम्यान पडलेली आहेत; याची कोणतीही माहिती निवडणूक आयोगाकडे नाही.महाराष्ट्रात ५ लाखांहून अधिक मत आली,मग ती आली कुठून?असा सवालही त्यांनी केला.केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन त्यांच्या पतीनेही निवडणुकीवर आक्षेप घेतला आहे. याबाबतचा त्यांनी व्हिडिओ दाखवला.निवडणूक आयोगाने पारदर्शकता पाळाली नाही; असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
सात वाजता मतदान झाल्यानंतर त्याचा रिपोर्ट उशीरा देण्यात आला.निवडणूक आयोगाने सायंकाळी ५ वाजता ५८.२२ टक्के मतदानाची टक्केवारी दिली. परंतु,६२.२ टक्के मतदान झाल्याचे त्यांनी रात्री ११.३० वाजता सांगितले.यावरून साडेसहा तासांमध्ये मतदान करुन घेतल्याचे समोर येते.तर दुसऱ्या दिवशी आयोगाकडून सांगितले जाते की,६६.५ टक्के मतदान झाले.मतदान झाल्यानंतर मतदानाची माहिती निवडणूक आयोगाकडून पत्रकार परिषदेत दिली जाते, ही पद्धत आहे.परंतु महाराष्ट्रातील निवडणूक आयोगाने कोणत्याही प्रकाराची पत्रकार परिषद घेतलेली नाही.
सुमारे ७६ लाखांची मतांची वाढ झालेली आहे. त्यामुळे आयोगाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.जनतेची मते चोरण्याचे आणि डाका टाकण्याचे काम आयोगाने केल्याचे यातून सिद्ध होत आहे.याचे उत्तर निवडणूक आयोगाने दिले पाहिजे. महाराष्ट्र ताब्यात घेण्याचे २०२० ला भाजपचे ठरले होते.पक्ष फोडले,चिन्ह घेतले,न्यायव्यवस्था हाती घेतली.सर्व बेकायदेशीर असुन सुप्रीम कोर्ट लक्ष द्यायला तयार नाही.असेच सर्व सुरु राहिल्यावर राजकारणात राहायचं कशाला? राजकारण सोडलेले बरं,अशी खंत पटोले यांनी यावेळी व्यक्त केली.
Udrek News

- Advertisement -
spot_imgspot_img

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपुरात..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यात उन्हाळा कडकु लागला आहे.त्यातच विदर्भात बहुतांश ठिकाणी उष्णतेची लाट आहे.आज,शनिवार १५ मार्च रोजी अकोला, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज...

नक्षलवाद्यांनी जंगलात पुरून ठेवलेली स्फोटके पोलिसांनी केली नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील नक्षलवाद संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.मोठ-मोठी नक्षली स्वतःहून पोलिसांपुढे आत्मसमर्पण करीत आहेत.काही नक्षली दाम्पत्य हिंसक मार्ग सोडून सुखी संसाराची स्वप्ने रंगवू लागली...

आत्ताची मोठी बातमी.. पाच मुलांचा घोडाझरी तलावात बुडून मृत्यू; दोन सख्खे भाऊ तर दोन चुलत भाऊ व एक मित्र..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील घोडाझरी येथे पर्यटनासाठी गेलेल्या सहा मुलांपैकी पाच मुलांचा  तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज,शनिवार १५ मार्च रोजी सायंकाळी ४...

फेसबुकवर भावनिक पोस्ट करीत बँकेच्या दारातच शिक्षकाने गळफास घेऊन केली आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  बीड :-शहरातील कृष्णा अर्बन बँकेच्या दारातच एसीच्या ग्रीलला गळफास घेऊन एका शिक्षकाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज,शनिवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे.शिक्षकाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!