Saturday, December 13, 2025
Homeउद्रेक न्युज वृत्तअसेच सर्व सुरु राहिल्यावर राजकारणात राहायचं कशाला? - निवडणुक प्रकियेवर शंका उपस्थित...

असेच सर्व सुरु राहिल्यावर राजकारणात राहायचं कशाला? – निवडणुक प्रकियेवर शंका उपस्थित करीत आमदार,उमेदवार जाणार कोर्टात- नाना पटोले

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल बघता निवडणुकीच्या प्रकियेवर शंका उपस्थित करीत निवडणूक आयोगाच्या व्यवस्थेवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज,गुरुवारी २८ नोव्हेंबरला संशय व्यक्त केला आहे.या विरोधात आमचे आमदार आणि उमेदवार कोर्टात जाणार आहेत; असे पटोले यांनी यावेळी सांगितले.
पटोले म्हणाले की,७.८७ टक्क्यांनी मतदानात वाढ झाली आहे.७६ लाख मते संध्याकाळी पाच सहाच्या दरम्यान पडलेली आहेत; याची कोणतीही माहिती निवडणूक आयोगाकडे नाही.महाराष्ट्रात ५ लाखांहून अधिक मत आली,मग ती आली कुठून?असा सवालही त्यांनी केला.केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन त्यांच्या पतीनेही निवडणुकीवर आक्षेप घेतला आहे. याबाबतचा त्यांनी व्हिडिओ दाखवला.निवडणूक आयोगाने पारदर्शकता पाळाली नाही; असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
सात वाजता मतदान झाल्यानंतर त्याचा रिपोर्ट उशीरा देण्यात आला.निवडणूक आयोगाने सायंकाळी ५ वाजता ५८.२२ टक्के मतदानाची टक्केवारी दिली. परंतु,६२.२ टक्के मतदान झाल्याचे त्यांनी रात्री ११.३० वाजता सांगितले.यावरून साडेसहा तासांमध्ये मतदान करुन घेतल्याचे समोर येते.तर दुसऱ्या दिवशी आयोगाकडून सांगितले जाते की,६६.५ टक्के मतदान झाले.मतदान झाल्यानंतर मतदानाची माहिती निवडणूक आयोगाकडून पत्रकार परिषदेत दिली जाते, ही पद्धत आहे.परंतु महाराष्ट्रातील निवडणूक आयोगाने कोणत्याही प्रकाराची पत्रकार परिषद घेतलेली नाही.
सुमारे ७६ लाखांची मतांची वाढ झालेली आहे. त्यामुळे आयोगाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.जनतेची मते चोरण्याचे आणि डाका टाकण्याचे काम आयोगाने केल्याचे यातून सिद्ध होत आहे.याचे उत्तर निवडणूक आयोगाने दिले पाहिजे. महाराष्ट्र ताब्यात घेण्याचे २०२० ला भाजपचे ठरले होते.पक्ष फोडले,चिन्ह घेतले,न्यायव्यवस्था हाती घेतली.सर्व बेकायदेशीर असुन सुप्रीम कोर्ट लक्ष द्यायला तयार नाही.असेच सर्व सुरु राहिल्यावर राजकारणात राहायचं कशाला? राजकारण सोडलेले बरं,अशी खंत पटोले यांनी यावेळी व्यक्त केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात अनेकांना नायलॉन मांजाच्या धाग्यामुळे आपला जीव गमावावा लागला आहे.नायलॉन मांजाची विक्री करण्यावर बंदी असतांनाही काहीजण पैश्याच्या लालसेने...

दोन श्रीमंत तरुणींशी प्रेमप्रकरण; दोघिंसाठी चोरायचा दुचाक्या.. – ५० सीसीटीव्ही फुटेजची तपासणी; २२ वर्षीय युवक ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपुर :-बीसीएचे शिक्षण घेणारा २२ वर्षीय युवक सोबतच एमपीएससीचे क्लासेस करतो.मध्यंतरी त्याची दोन श्रीमंत तरुणींशी मैत्री झाली आणि नंतर त्यांचे प्रेमप्रकरण सुरू...

आता शेत रस्ते आणि वहिवाटीच्या वादात मिळणार मोफत पोलीस संरक्षण; विधेयक मंजूर..

उद्रेक न्युज वृत्त :-शेत रस्ते आणि वहिवाटीच्या प्रश्नांवर जलद गतीने नोटीस बजावणे आणि त्यावर निर्णय घेणे शक्य होणार आहे.त्याचबरोबर,अर्जदार शेतकऱ्यांना आता मोफत पोलीस संरक्षण...

जखमी अवस्थेत आढळून आलेल्या वाघिणीचा मृत्यू.. – वनविभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील धानोरी गावानजिकच्या गोसेखुर्द धरणाच्या(इंदिरा सागर प्रकल्प) मुख्य उजव्या कालव्याच्या मार्गावर मंगळवार ९ डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास एक वाघ...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!