Tuesday, September 8, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तअसेच सर्व सुरु राहिल्यावर राजकारणात राहायचं कशाला? - निवडणुक प्रकियेवर शंका उपस्थित...

असेच सर्व सुरु राहिल्यावर राजकारणात राहायचं कशाला? – निवडणुक प्रकियेवर शंका उपस्थित करीत आमदार,उमेदवार जाणार कोर्टात- नाना पटोले

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल बघता निवडणुकीच्या प्रकियेवर शंका उपस्थित करीत निवडणूक आयोगाच्या व्यवस्थेवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज,गुरुवारी २८ नोव्हेंबरला संशय व्यक्त केला आहे.या विरोधात आमचे आमदार आणि उमेदवार कोर्टात जाणार आहेत; असे पटोले यांनी यावेळी सांगितले.
पटोले म्हणाले की,७.८७ टक्क्यांनी मतदानात वाढ झाली आहे.७६ लाख मते संध्याकाळी पाच सहाच्या दरम्यान पडलेली आहेत; याची कोणतीही माहिती निवडणूक आयोगाकडे नाही.महाराष्ट्रात ५ लाखांहून अधिक मत आली,मग ती आली कुठून?असा सवालही त्यांनी केला.केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन त्यांच्या पतीनेही निवडणुकीवर आक्षेप घेतला आहे. याबाबतचा त्यांनी व्हिडिओ दाखवला.निवडणूक आयोगाने पारदर्शकता पाळाली नाही; असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
सात वाजता मतदान झाल्यानंतर त्याचा रिपोर्ट उशीरा देण्यात आला.निवडणूक आयोगाने सायंकाळी ५ वाजता ५८.२२ टक्के मतदानाची टक्केवारी दिली. परंतु,६२.२ टक्के मतदान झाल्याचे त्यांनी रात्री ११.३० वाजता सांगितले.यावरून साडेसहा तासांमध्ये मतदान करुन घेतल्याचे समोर येते.तर दुसऱ्या दिवशी आयोगाकडून सांगितले जाते की,६६.५ टक्के मतदान झाले.मतदान झाल्यानंतर मतदानाची माहिती निवडणूक आयोगाकडून पत्रकार परिषदेत दिली जाते, ही पद्धत आहे.परंतु महाराष्ट्रातील निवडणूक आयोगाने कोणत्याही प्रकाराची पत्रकार परिषद घेतलेली नाही.
सुमारे ७६ लाखांची मतांची वाढ झालेली आहे. त्यामुळे आयोगाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.जनतेची मते चोरण्याचे आणि डाका टाकण्याचे काम आयोगाने केल्याचे यातून सिद्ध होत आहे.याचे उत्तर निवडणूक आयोगाने दिले पाहिजे. महाराष्ट्र ताब्यात घेण्याचे २०२० ला भाजपचे ठरले होते.पक्ष फोडले,चिन्ह घेतले,न्यायव्यवस्था हाती घेतली.सर्व बेकायदेशीर असुन सुप्रीम कोर्ट लक्ष द्यायला तयार नाही.असेच सर्व सुरु राहिल्यावर राजकारणात राहायचं कशाला? राजकारण सोडलेले बरं,अशी खंत पटोले यांनी यावेळी व्यक्त केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गावाजवळच दर्जेदार शिक्षण; चार शाळा बनणार ‘मॉडेल शाळा’..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासीबहुल आणि दुर्गम एटापल्ली तालुक्यातील विद्यार्थ्यांना गावाजवळच आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि सर्वांगीण शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तालुक्यातील चार शाळा ‘मॉडेल शाळा’...

भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत; राज्यातील सर्व सहा विभागांना देणार प्रत्यक्ष भेटी.. – थेट संवादासह आपल्या सूचना व अभिप्राय संबंधित विभागाच्या ई-मेलवर...

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत...

‘युजीसी-नेट’ परीक्षा केंद्राच्या दोनशे मीटर परिसरात मनाई आदेश जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय परीक्षा एजन्सी(NTA),नवी दिल्ली यांच्यामार्फत आयोजित 'विद्यापीठ अनुदान आयोग-राष्ट्रीय पात्रता परीक्षा'(UGC-NET)जून-२०२६ ची परीक्षा गडचिरोली येथील शासकीय विज्ञान महाविद्यालय,चामोर्शी रोड,कन्नमवार नगर येथे...

देसाईगंजच्या जुनी वडसा येथील सिटी सर्व्हे प्रक्रिया अंतिम टप्प्यात; हरकतींसाठी पंधरा दिवसांची मुदत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भूमी अभिलेख विभागामार्फत देसाईगंज शहराच्या मौजा-जुनी वडसा येथील नगर भूमापन(सिटी सर्व्हे)प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, जमीनधारकांचे हक्क व सीमा दर्शविणारा प्रारूप...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!