Saturday, March 15, 2025
Homeमुंबईअबब...! ४०० कोटींचा रेती घोटाळा -घोटाळ्यात ब्रम्हपूरी तालुक्यातील अह्रेर- नवरगांव,बोडदा,चीचगाव, हळदा रेती...
spot_img

अबब…! ४०० कोटींचा रेती घोटाळा -घोटाळ्यात ब्रम्हपूरी तालुक्यातील अह्रेर- नवरगांव,बोडदा,चीचगाव, हळदा रेती घाटांचा समावेश

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

मुंबई :- चंद्रपूर जिल्ह्यातील व ब्रह्मपुरी तालुक्यातील अह्रेर- नवरगाव,बोडदा चिचगाव आणि हळदा या नावाने वैनगंगा नदी येथील चार घाट खणीकर्म महामंडळाला शासकीय प्रकल्पास तसेच शासकीय योजनेअंतर्गत चालू असलेल्या विविध विकास कामांना वाळू पुरवण्याकरिता दिलेले होते.शासकीय प्रकल्पाचे नाव पुढे करून अवैधरित्या थेट नदीमधून रेती उत्खनन करून खाजगी बांधकामाच्या ठिकाणी धाडून करोडो रुपयांची वाळू परस्पर विकण्यात आली आहे.

नियमानुसार वाळू उत्खनन स्थानिक मजुरांच्या माध्यमातून करायचे असते आणि नदीतून स्टॉक यार्ड पर्यंत ट्रॅक्टर द्वारे वाहतूक करायची असते; परंतु या ठिकाणी सर्व नियम व कायद्याला बाजूला ठेवत थेट नदीमधून ट्रक द्वारे,पोकलेन द्वारे हजारो ट्रक वाळू बाहेर विकण्यात आले असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

नागपूरमध्ये सुमारे ४०० कोटींचा रेती घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप काल बुधवारी १५ फेब्रुवारी रोजी मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपा ग्रामविकास पंचायतराजचे जिल्हाध्यक्ष डॉ.राजेश ठाकरे यांनी केला आहे.नागपूर येथील शिंदे गटातील स्थानिक राजकारण्यांनी पदाच्या दुरुपयोग करीत गौण खनिज संदर्भात (रेती घोटाळा) ४०० कोटीपेक्षा अधिक रुपयांचा शासकीय महसुल घशात घातला आहे.त्यामुळे त्यांनी राज्य सरकारची फसवणूक केले.त्या संदर्भात उच्चस्तरीय चौकशी व्हावी व दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे.

Udrek News

- Advertisement -
spot_imgspot_img

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपुरात..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यात उन्हाळा कडकु लागला आहे.त्यातच विदर्भात बहुतांश ठिकाणी उष्णतेची लाट आहे.आज,शनिवार १५ मार्च रोजी अकोला, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज...

नक्षलवाद्यांनी जंगलात पुरून ठेवलेली स्फोटके पोलिसांनी केली नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील नक्षलवाद संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.मोठ-मोठी नक्षली स्वतःहून पोलिसांपुढे आत्मसमर्पण करीत आहेत.काही नक्षली दाम्पत्य हिंसक मार्ग सोडून सुखी संसाराची स्वप्ने रंगवू लागली...

आत्ताची मोठी बातमी.. पाच मुलांचा घोडाझरी तलावात बुडून मृत्यू; दोन सख्खे भाऊ तर दोन चुलत भाऊ व एक मित्र..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील घोडाझरी येथे पर्यटनासाठी गेलेल्या सहा मुलांपैकी पाच मुलांचा  तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज,शनिवार १५ मार्च रोजी सायंकाळी ४...

फेसबुकवर भावनिक पोस्ट करीत बँकेच्या दारातच शिक्षकाने गळफास घेऊन केली आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  बीड :-शहरातील कृष्णा अर्बन बँकेच्या दारातच एसीच्या ग्रीलला गळफास घेऊन एका शिक्षकाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज,शनिवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे.शिक्षकाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!