Monday, December 8, 2025
Homeमुंबईअखेर माय मराठीसाठी तब्बल २० वर्षांनी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र..

अखेर माय मराठीसाठी तब्बल २० वर्षांनी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-सत्तेच्या राजकारणामुळे एकेकाळी दुरावलेले भाऊ आता पुन्हा एकत्र दिसणार काय? दिसणार तर त्यांची एंट्री कशी असेल आणि ते काही राजकीय संदेश देतील का? याबाबतची उत्सुकता निर्माण झालेली असतांनाच गेल्या १९ ते २० वर्षांपासून ज्या दिवसाची वाट अनेकजण पाहत होते तो दिवस आज,शनिवार ५ जुलै २०२५ रोजी उजळला अन् अखेर माय मराठीसाठी तब्बल २० वर्षांनी ठाकरे बंधू एकत्र आले.उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे बंधू एकत्र आलेच.यांना एकत्र आणण्यामागे मराठी भाषेवरील प्रेम हेच प्रमुख कारण असल्याचे मानले जात आहे.अलीकडेच महाराष्ट्र सरकारने त्रिभाषा धोरणाबाबत एक आदेश जारी केला होता,ज्यावरून महाराष्ट्रात मोठा वाद निर्माण झाला.या आदेशाला दोन्ही ठाकरे बंधूंनी तीव्र विरोध दर्शवला. त्यांच्या विरोधामुळे सरकारने आपल्या आदेशावर ‘यू-टर्न’ घेतला आणि हिंदी सक्तीबाबतचा आदेश रद्द केला.
सरकारच्या या निर्णयाला आपला आणि मराठी भाषेचा विजय मानत आज हा ‘विजयी मेळावा’ वरळीतील एनएससीआय डोम येथे आयोजित करण्यात आला होता.उद्धव आणि राज ठाकरे यांच्या एन्ट्रीला एक खास गाणे वाजविण्यात आले. ‘कोण आला रे, कोण आला? महाराष्ट्राचा वाघ आला.आपले साहेब ठाकरे-ठाकरे… हे २०१९ मधील ‘ठाकरे’ चित्रपटातील गाणे वाजले आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.लाखोच्या संख्येने गोळा झालेले काही कार्यकर्ते भावूक होतांना दिसून येत होते.यापूर्वी,२००५ मध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे शेवटचे एकाच व्यासपीठावर एकत्र दिसले होते. तत्कालीन मुख्यमंत्री नारायण राणे यांनी अविभाजित शिवसेना सोडल्यानंतर मालवण विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी दोघेही उपस्थित होते.त्याच वर्षी राज ठाकरे यांनीही २७ नोव्हेंबर २००५ रोजी शिवसेनेचा राजीनामा दिला आणि त्यानंतर २००६ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) या पक्षाची स्थापना केली होती.विशेष म्हणजे,ज्या ठिकाणी हा मेळावा आयोजित केला गेला,तो परिसर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या विधानसभा मतदारसंघात येतो.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोलीत साहित्यिकांची मांदियाळी..! नाट्यश्रीचा वाङ्ममय पुरस्कार सोहळा व काव्य संमेलन संपन्न.. – इंग्लंड,गोवा,बुऱ्हाणपूर,बंगलोर येथील साहित्यिकांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नाट्यश्री साहित्य कला मंचच्या वतीने आयोजित महामृत्युंजय वाङ्ममय पुरस्कार सोहळा तसेच कवी संमेलनासाठी राज्यभरातून तसेच देश विदेशातून साहित्यिकांची मांदीयाळी काल,रविवार ७...

एका ठिकाणी पती-पत्नीने; तर दुसऱ्या ठिकाणी टॉप टेन नक्षलवाद्यांनी सोडली लाल दहशत..

उद्रेक न्युज वृत्त :-दुर्गम भागात बऱ्याच कालावधीपासून लाल दहशतीचे सावट पसरले होते.यामुळे तेथील विकास कोसोदुर राहिला आणि अजूनही काही ठिकाणी जैसे-थे अवस्था पहावयास मिळत...

अजब रोमियोचा गजब कारनामा..! नर्सिंग कॉलेजात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीला रस्त्यात गाठले अन् गालाचा घेतला मुका.. – आरोपीची तुरुंगात रवानगी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपुर :-जिल्ह्याच्या भिवापूर शहरात अजब रोड रोमियोचा गजब कारनामा उघडकीस येताच पोलिसांनी अटक केल्यानंतर लागलीच त्याला भिवापूर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयापुढे...

दौलत कुथे ‘नाट्यश्री २०२५’ पुरस्काराने सन्मानित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नाट्यश्री साहित्य कला मंच गडचिरोली यांच्या वतीने आयोजित ‘महामृत्युंजय वाड्:मय स्पर्धा २०२५’ पुरस्कार वितरण सोहळा काल,रविवार ७ डिसेंबर रोजी जिल्हा मध्यवर्ती...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!