- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-राज्यात पावसाची उघडीप सुरू असतांनाच परत पुन्हा आज,शनिवार ५ जुलैपासून ते ९ जुलैपर्यंत पाऊस थैमान घालणार आहे.याबाबत प्रादेशिक हवामान केंद्र व पृथ्वी मंत्रालयाने हवामान अंदाजाची अधिकृत घोषणा केली आहे.अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्राकार वाऱ्यांमुळे पश्चिम बंगाल व आजूबाजूच्या परिसरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने याचा परिणाम महाराष्ट्रावर होणार असून कोकण,मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात पुढील चार दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस हजेरी लावण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.तसेच ४५ ते ५५ किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहतील व संपूर्ण कोकण किनारपट्टी,उत्तर महाराष्ट्र व विदर्भात पुढील चार दिवस पावसाचा जोर वाढणार आहे.त्यानुसार आज,शनिवार ५ जुलै रोजी सिंधुदुर्ग,रत्नागिरी, रायगड,ठाणे,पालघर तसेच नाशिक,पुणे,सातारा व कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.तर मुंबई,नंदुरबार,धुळे, जळगाव,छत्रपती संभाजीनगर,जालना,परभणी व हिंगोली इत्यादी जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
उद्या,रविवार ६ जुलै रोजी पुणे घाटमाथ्यावर रेड अलर्ट,मुंबई वगळता संपूर्ण कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट,कोल्हापूर,सातारा आणि नाशिकच्या घाटमाथ्यावरही तुफान पावसाचा ऑरेंज अलर्ट तर बीड,नांदेड,परभणी,हिंगोली,जालना,छत्रपती संभाजीनगर,जळगाव,धुळे,नंदुरबार,वर्धा,नागपूर, भंडारा,गोंदिया,चंद्रपूर व गडचिरोली इत्यादी जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.तर सोमवार ७ जुलै रोजी पुणे घाटमाथ्यावर रेड अलर्ट तर रत्नागिरी, रायगड,भंडारा गोंदिया,नाशिक व साताऱ्याचा घाटमाथा ऑरेंज अलर्ट आणि मुंबई,ठाणे,पालघर,नाशिक,नंदुरबार,धुळे,जळगाव, छत्रपती संभाजीनगर,जालना,परभणी,हिंगोली,नांदेड, नागपूर,वर्धा,चंद्रपूर, गडचिरोली इत्यादी जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.तसेच मंगळवार ८ जुलै रोजी रत्नागिरी गोंदिया व सातारा घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट, रायगड सिंधुदुर्ग नागपूर,भंडारा,चंद्रपूर,गडचिरोली तसेच कोल्हापूर व पुणे घाटमाथ्यावर पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.त्याचप्रमाणे बुधवार ९ जुलै रोजी तळ कोकणासह पुढे सातारा व कोल्हापूर घाटमाथ्यावरील व नागपूर,भंडारा,गोंदिया यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
- Advertisement -

