उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :- अनोळखी महिलेचा फोन नंबर आणण्याची तीन जणांनी ५० हजार रुपयांची पैज लावली होती. मात्र ही पैज लावणे तिघांना चांगलेच महागात पडले आहे.यात पन्नास हजार रुपयांची पैज लावणाऱ्या तिघांना महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे.
सदरचा प्रकार नागपूरमध्ये घडला असून पोलिसांनी मनोज छाबरा,राजेश तालरेजा आणि सुधीर कुऱ्हाडकर या तिघांना ताब्यात घेतले आहे.या प्रकरणात तीन मैत्रीणी एका हॉटेलमध्ये जेवायला गेल्या होत्या.दरम्यान त्याच ठिकाणी तिघे मित्र हे सुद्धा जेवायला आले होते.जेवण सुरू असताना त्यांनी महिलाबद्दल टिपणी केली.मात्र महिलांनी त्याकडे दुर्लक्ष केले.पण ते तिघे एवढ्यावर न थांबता त्यांनी हद्द पार करत महिलेशी जाऊन बोलणे आणि मोबाईल नंबर आणल्यास ५० हजार रुपये देऊ असे ठरवत पैज लावली.
यात ठरल्यानुसार त्यांनी महिला राहत असलेल्या अपार्टमेंट पर्यंत पाठलाग केला.त्यानंतर बोलण्याचा प्रयत्न करत महिलेच्या मनाविरुद्ध कृत्य केल्याने विनयभंग केल्याची तक्रार सादर पोलिसांत केली. यात पोलिसांनी संपूर्ण घटनेचा तपास केला असता यात तिघांचे नाव समोर आले.त्यानंतर एक जण हा नागपुरातील असून त्याच्याकडून माहिती घेत दोघांना अमरावती येथून ताब्यात घेतले आहे.तसेच अश्या घटना घडल्यास दुर्लक्ष न करता पोलिसांशी संपर्कसाधण्याचे आवाहन उपायुक्त राहुल मदने यांनी केले आहे.

