उद्रेक न्युज वृत्त
मुख्य संपादक/सत्यवान रामटेके
गडचिरोली :- भारतीय हवामान केंद्र विज्ञान विभाग नागपूर यांनी वर्तविण्यात आलेल्या अंदाजानुसार आजपासून पुढील चार दिवस अवकाळी पावसाचे यलो अलर्ट जारी करण्यात आले आहे.त्यानुसार गडचिरोली जिल्हासह पाच जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मेघ गर्जना,गारपीट आणि वादळ वारा(वेग ४० ते ५० किमी प्रती तास) असणार आहे.
हल्ली उकाड्याचे दिवस सुरू असल्याने दिवसा शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांनी घराबाहेर निघणे टाळले आहे.त्यामुळे रस्ते तसेच इतर परिसर सामसूम दिसून येतात.अशातच आता आजपासून पुढील चार दिवस उकाड्यापासून नागरिकांची होणारी लाही काहीशी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.त्यानुसार गडचिरोली,चंद्रपूर,नागपूर,भंडारा,गोंदिया तसेच वर्धा जिल्ह्यात अवकाळी पाऊस थैमान घालणार असल्याचे हवामान खात्याने अंदाज वर्तविला आहे.त्यानुसार आजपासून गडचिरोली जिल्ह्याच्या काही भागात वादळ वारा तसेच ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. गडचिरोली,चंद्रपूर,नागपूर,भंडारा,गोंदिया तसेच वर्धा जिल्ह्यात दिनांक – ७ मे ते ११ मे पर्यंत विजांच्या कडकडाटासह मेघ गर्जना,गारपीट आणि वादळ वारा(वेग ४० ते ५० किमी प्रती तास) अंदाज वर्तविण्यात आला आहे.त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी; असे आवाहन करण्यात आले आहे.अवकाळी पाऊस पडला तर शेतकरी बांधवांची गोची होणार आहे.काही दिवसात धान कापणीला सुरुवात होणार असल्याने तोंडातील घास हिरावण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

