Saturday, August 29, 2026
Homeगडचिरोलीआजपासून पुढील चार दिवस अवकाळी पावसाचे संकेत-गडचिरोलीसह पाच जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मेघ...

आजपासून पुढील चार दिवस अवकाळी पावसाचे संकेत-गडचिरोलीसह पाच जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मेघ गर्जना,गारपीट आणि वादळ वारा…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

मुख्य संपादक/सत्यवान रामटेके 

गडचिरोली :- भारतीय हवामान केंद्र विज्ञान विभाग नागपूर यांनी वर्तविण्यात आलेल्या अंदाजानुसार आजपासून पुढील चार दिवस अवकाळी पावसाचे यलो अलर्ट जारी करण्यात आले आहे.त्यानुसार गडचिरोली जिल्हासह पाच जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मेघ गर्जना,गारपीट आणि वादळ वारा(वेग ४० ते ५० किमी प्रती तास) असणार आहे.

हल्ली उकाड्याचे दिवस सुरू असल्याने दिवसा शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांनी घराबाहेर निघणे टाळले आहे.त्यामुळे रस्ते तसेच इतर परिसर सामसूम दिसून येतात.अशातच आता आजपासून पुढील चार दिवस उकाड्यापासून नागरिकांची होणारी लाही काहीशी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.त्यानुसार गडचिरोली,चंद्रपूर,नागपूर,भंडारा,गोंदिया तसेच वर्धा जिल्ह्यात अवकाळी पाऊस थैमान घालणार असल्याचे हवामान खात्याने अंदाज वर्तविला आहे.त्यानुसार आजपासून गडचिरोली जिल्ह्याच्या काही भागात वादळ वारा तसेच ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. गडचिरोली,चंद्रपूर,नागपूर,भंडारा,गोंदिया तसेच वर्धा जिल्ह्यात दिनांक – ७ मे ते ११ मे पर्यंत विजांच्या कडकडाटासह मेघ गर्जना,गारपीट आणि वादळ वारा(वेग ४० ते ५० किमी प्रती तास) अंदाज वर्तविण्यात आला आहे.त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी; असे आवाहन करण्यात आले आहे.अवकाळी पाऊस पडला तर शेतकरी बांधवांची गोची होणार आहे.काही दिवसात धान कापणीला सुरुवात होणार असल्याने तोंडातील घास हिरावण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गरोदर मातेला नेले झोळीतून; घटनेनंतर प्रशासनाला आली जाग.. -आता कोईदूळ नाल्यावरील पुलाचा प्रश्न मार्गी लागणार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील कोईदूळ गावातील रहिवासी छाया सुरेश नैताम वय २६ वर्षे यांना आज,शुक्रवार २८ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास प्रसूती कळा सुरू...

सोशल मीडियावर जातीवाचक वक्तव्य करणे कराळे मास्तरला चांगलेच भोवले; अटक करून कारागृहात रवानगी..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-वर्ध्यातील 'फिनिक्स अकॅडमी'चे संचालक, सामाजिक कार्यकर्ते तथा सोशल मीडिया इन्फ्लुएंसर असलेले कराळे मास्तर यांना सोशल मीडियावर एका विशिष्ट समाजाविषयी जातीवाचक वक्तव्य...

आता मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची जबाबदारी नेमकी कोणाकडे? -तसेही “सरपंच-प्रशासक” बिन पगारी अन् फुल्ल अधिकारीच..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शासनाने गावगाडा हाकणाऱ्या पदाधिकाऱ्यांना मोठा दिलासा देत शनिवार २१ फेब्रुवारी २०२६ रोजी महाराष्ट्र राज्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली वा...

राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या अंगरक्षकावर महिलेचा लैंगिक शोषणाचा आरोप; पोलिसांत गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याचे वित्त व नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधि व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांच्या ३८ वर्षीय अंगरक्षकाने(पोलीस कर्मचारी)एका विवाहित...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!