Thursday, April 16, 2026
Homeनागपूरसर्व पैसे सिलेंडर खरेदीत खर्च करायचे; तर कमवायचे काय?

सर्व पैसे सिलेंडर खरेदीत खर्च करायचे; तर कमवायचे काय?

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-राज्याच्या उपराजधानीत गेल्या काही दिवसांपासून सिलिंडरसोबतच घरगुती गॅस सिलिंडरचा व्यावसायिक प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून, सर्वसामान्यांचे स्वयंपाकघर अक्षरशः विस्कळीत झाले आहे.एकीकडे गॅस एजन्सीबाहेर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत, तर दुसरीकडे जिल्हा प्रशासन सर्व काही ‘सुरळीत’ असल्याचा दावा करत आहे.प्रशासनाच्या या दाव्यामुळे संतप्त झालेल्या गृहिणींनी ‘विश्वास नक्की कोणावर ठेवायचा?’ असा जळजळीत सवाल उपस्थित केला आहे.विशेष म्हणजे,व्यावसायिक वापराचा गॅस सिलेंडर मिळत नसल्यामुळे मार्गावरील फूड विक्रेते संकटात सापडले आहेत.डोसा,नूडल्स,मंच्युरियन, दाबेली,तरी पोहे आदी खाद्य पदार्थांसाठी मोठ्या प्रमाणात गॅसचा वापर करावा लागतो.मात्र,गॅस मिळत नसल्यामुळे संबंधित खाद्यपदार्थ तयार करणेच बंद करावे लागले आहे.ब्लॅकमध्ये व्यावसायिक सिलिंडर तीन हजार रुपयांपर्यंत मिळत आहे.सर्व पैसे सिलिंडर खरेदीत खर्च करायचे तर कमवायचे काय? असा प्रश्न या विक्रेत्यांना पडला आहे.त्यामुळे अनेकांनी आता घरूनच इडली,उपमा तयार करून आणून विकण्यास सुरुवात केली आहे.काहींनी तर ठेल्यांवर भेळ विकण्यास सुरुवात केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला...

आता प्रत्येक लाभार्थी कुटुंबास मिळणार तीन लिटर रॉकेल..

उद्रेक न्युज वृत्त :-जमाना कितीही बदलला तरीही 'जुनं ते सोनं' अशी अवस्था केवळ आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!