Sunday, August 2, 2026
Homeनागपूरवडिलांची नाही तर आईची कागदपत्रे विचारात घेऊन जात वैधता प्रमाणपत्र जारी करण्याचे...

वडिलांची नाही तर आईची कागदपत्रे विचारात घेऊन जात वैधता प्रमाणपत्र जारी करण्याचे निर्देश..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-कित्तेक प्रकरणांमध्ये केवळ वडिलांच्या नावांची कागदपत्रे विचारात घेऊन जात प्रमाणपत्र,जात वैधता प्रमाणपत्र,उत्पन्नाचा दाखला व इतर महत्वाची दस्तऐवजे वेगवेगळ्या ठिकाणी द्यावी लागत असतात. मात्र,वेगळे राहत असलेल्या वडिलांनी जर कां कागदपत्रे देण्यास नकार दिल्यास मुलांचे भवितव्य अंधारात गेल्याशिवाय राहणार नाही.असाच प्रकार एका मुलाच्या बाबतीत घडल्याने त्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली.प्रकरणी न्यायलयाने दिलेल्या निर्णयाने अनेक मुलांचे भवितव्य अंधारातून उजेडात आले आहे.न्यायलयाने जन्म झाल्यापासूनच वडिलांसोबत राहत नसलेल्या मुलाला आईची कागदपत्रे विचारात घेऊन जात वैधता प्रमाणपत्र(कास्ट व्हॅलिडीटी) जारी करण्यावर निर्णय घ्या,असा आदेश भंडारा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीला दिला असून याकरिता समितीला २० फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली आहे.
प्रकरणामध्ये मुलाचे आई-वडील त्याच्या जन्मापूर्वीच वेगळे झाले.त्यामुळे तो जन्मापासून आईसोबत राहत आहे.वडिलांचा त्याच्या पालनपोषणाला काहीच हातभार लागला नाही.आईनेच कष्ट करून त्याला लहानाचे मोठे केले आणि उच्चशिक्षणाकरिता पात्र केले.मुलाचे वडील मध्यप्रदेश तर,आई महाराष्ट्रातील रहिवासी आहे.दोघेही लोहार जातीचे असून ही जात या दोन्ही राज्यांमध्ये भटक्या जमाती प्रवर्गामध्ये मोडते.असे असतांना वडिलांच्या जातीची कागदपत्रे सादर केली नाही,या कारणामुळे जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने ९ डिसेंबर २०२१ रोजी मुलाला लोहार-भटक्या जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र नाकारले.परिणामी,मुलाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करून या निर्णयाला आव्हान दिले होते.याचिकेवर न्यायमूर्ती मुकुलिका जवळकर व नंदेश देशपांडे यांच्यासमक्ष अंतिम सुनावणी झाली.दरम्यान,मुलाचे वकील ॲड.शैलेश नारनवरे यांनी प्रकरणातील तथ्यांकडे लक्ष वेधून जातवैधता प्रमाणपत्रासाठी वडिलांची कागदपत्रे मागणे मुलाकरिता अन्यायकारक आहे,असा दावा केला.तसेच,मुलगा वडिलांची कागदपत्रे देऊ शकत नाही.त्यामुळे त्याला आईचेच कागदपत्रे विचारात घेऊन जात वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे,अशी मागणी केली. त्यानुसार,मुलाला आईच्या कागदपत्रांवरून जात वैधता प्रमाणपत्र देण्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निर्णय दिला.यामुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर लाचखोर विभागीय वन अधिकाऱ्यास चार दिवसांची पोलीस कोठडी..

उद्रेक न्युज वृत्त  बीड :-राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी ३१ जुलै रोजी जशी जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली,तशीच...

आज २५० युवक-युवतींनी घेतली व्यसनमुक्तीची शपथ; गडचिरोलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आभासी संवाद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयांतर्गत माय भारत(MY Bharat)यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'व्यसनमुक्त युवा- विकसित भारत संकल्प अभियान' अंतर्गत आज...

आता राज्यात अंमलात येणार धर्मांतर-विरोधी ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा-२०२६’.. -कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यास सात वर्षापर्यंतच्या कारावासाची तरतूद..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध जिल्ह्यात अनेक नागरिकांनी स्वतःचा धर्म बदलून दुसऱ्या धर्माचे स्वीकार केल्याचे,तसेच धर्म बदलल्यानंतरही मूळ धर्मातील लाभ घेण्याचा सपाटा चालवल्याचे...

अखेर ‘त्या’ आत्महत्येचे कारण आले समोर.. – दोन सख्ख्या भावांनी धावत्या रेल्वेसमोर उडी घेतल्याचे प्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील माळेगाव  टाऊन परिसरात गुरुवार ३० जुलै २०२६ रोजी दोन सख्ख्या भावांचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना सकाळच्या सुमारास...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!