Tuesday, September 1, 2026
Homeगडचिरोलीराज्यस्तरीय "महामृत्युंजय वाङ्मय स्पर्धा २०२६" साठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन.. - रोख रक्कम,आकर्षक...

राज्यस्तरीय “महामृत्युंजय वाङ्मय स्पर्धा २०२६” साठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन.. – रोख रक्कम,आकर्षक सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-नाट्यश्री साहित्य कला मंच,गडचिरोली या संस्थेतर्फे राज्यस्तरीय महामृत्युंजय वाङ्मय स्पर्धा-२०२६ चे आयोजन करण्यात आले आहे.नाट्यश्रीतर्फे साहित्यिकांच्या साहित्यकृतींना प्रेरणा मिळावी,या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आलेला असून गेल्या दोन वर्षात अनुक्रमे ३६ व ३३ साहित्यिकांना तसेच १९ साहित्यिकांना उत्तेजनार्थ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
या “राज्यस्तरीय महामृत्युंजय वाङ्मय पुरस्कार-२०२६” साठी १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत प्रकाशित झालेले मराठी भाषेतील साहित्य स्विकारले जातील.तरी १)कादंबरी, २)कथासंग्रह,३) कवितासंग्रह/गझलसंग्रह,४) समीक्षा किंवा संपादन,५) नाटक/एकांकिका किंवा नाट्यविषयक ग्रंथ, ६)आत्मकथन किंवा चरित्रग्रंथ,७) ललीत/वैचारिक लेखसंग्रह/ प्रवासवर्णन व ८)बाल/कुमार साहित्य व ९) संकिर्ण म्हणजेच वरील सर्व प्रकारात न मोडणारे कोणतेही साहित्य प्रकार,या वाङ्मय प्रकारातील प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. रोख रक्कम,आकर्षक सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असून इच्छुक साहित्यिकांनी आपल्या साहित्यकृतीच्या दोन प्रती व अल्पपरिचय,केवळ पोस्टानेच चुडाराम बल्हारपुरे(नाटककार),महामृत्युंजय निवास,वार्ड क्रं.१७,राधे बिल्डिंगच्या मागे,चामोर्शी रोड,गडचिरोली पिन-४४२६०५(महाराष्ट्र राज्य),भ्रमणध्वनी क्र.९६२३६६३४३५, या पत्त्यावर ३० जून २०२६ पर्यंत पाठवावे,असे आवाहन संस्थेचे संचालक/संस्थापक चुडाराम बल्हारपुरे यांनी निवेदनाद्वारे केलेआहे.(पुरस्कारप्राप्त साहित्यिक यांना पोस्टाने पुरस्कार पाठविल्या जाणार नाही.पुरस्कार वितरण सोहळ्यास प्रत्यक्ष उपस्थित राहावे लागेल.त्यासाठी संमेलनशुल्क, सहभाग शुल्क किंवा इतर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.) (पुस्तके मिळताच व्हाट्सअप वर वैयक्तिकरित्या पोच दिल्या जाईल व यथावकाश निकालही कळविला जाईल.)
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

आजपासून बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी आज,मंगळवार १ सप्टेंबर पासून 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य करण्यात आले...

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!