- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-क्रिकेटचा एकदिवसीय सामना असो वा सिरीज सामना असो,भारत विरुद्ध इतर देशांशी होणारे सामने पाहण्यात जितके रस नाही,त्याहीपेक्षा कितीतरी अधिक पटीने भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पाहण्यात लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत,त्याचबरोबर जगभरात अनेकजण उत्सुक असतात.अश्यातच आज, रविवार १५ फेब्रुवारीला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वर्ल्डकप-२०२६ स्पर्धेतील २७ व्या गटातील ट्वेंटी-२० चा सामना खेळवला जाणार असल्याने आज सकाळपासूनच क्रिकेट चाहत्यांना या हाय-व्होल्टेज सामन्याची नशा चढल्याचे दिसून येत आहे.सदरचा सामना आज रविवारी श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथील आर.प्रेमदासा स्टेडियममध्ये खेळवला जाणार असून सामना संध्याकाळी ७ वाजता सुरू होईल.तर टॉस साडेसहा वाजता सुरू होणार आहे.चाहत्यांसाठी हा केवळ सामना नसून प्रतिष्ठेची लढाई आहे,ज्यात प्रत्येक चेंडू आणि प्रत्येक धाव निर्णायक ठरू शकते.ट्वेंटी-ट्वेंटीच्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान आतापर्यंत १६ वेळा आमनेसामने आले आहेत.त्यात,भारताने तब्बल १३ सामने जिंकले,तर पाकिस्तानने ३ तीन सामने जिंकलेत.त्यामुळे,आजचा सामना अत्यंत रंगतदार होऊन रात्रीच्या सुमारास क्रिकेट प्रेमींकडून फटाक्यांची आतषबाजी पहावयास मिळणार आहे.
टीम :-
भारत : सूर्यकुमार यादव(कॅप्टन),ईशान किशन,संजू सैमसन,अभिषेक शर्मा,तिलक वर्मा,रिंकू सिंह,अक्षर पटेल,शिवम दुबे,हार्दिक पांड्या,वॉशिंगटन सुंदर, जसप्रीत बुमराह,अर्शदीप सिंह,कुलदीप यादव,हर्षित राणा,वरुण चक्रवर्ती.
पाकिस्तान : सलमान अली आगा(कॅप्टन),अबरार अहमद,बाबर आजम,फहीम अशरफ,फखर जमां, ख्वाजा नफे,मोहम्मद नवाज,मोहम्मद सलमान मिर्जा, नसीम शाह,साहिबजादा फरहान,सईम अयूब,शाहीन शाह अफरीदी,शादाब खान,उस्मान खान,उस्मान तारिक.
- Advertisement -

