Saturday, September 5, 2026
Homeगडचिरोलीरस्ते कामांना गती द्या-जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा - जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तब्बल तीन तास...

रस्ते कामांना गती द्या-जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा – जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तब्बल तीन तास मॅराथॉन बैठक..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-वनविभागाच्या परवानगी अभावी प्रलंबित रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण व्हावी व रस्ते प्रकल्पांतील वनपरवानगीच्या अडचणी सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या अध्यक्षतेखाली आज,शनिवार २४ मे रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांची तब्बल तीन तास मॅराथॉन बैठक घेण्यात आली.या बैठकीत पावसाळ्यापूर्वी पूर्ण करता येणाऱ्या व संपर्क तुटण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या रस्त्यांची सविस्तर माहिती घेण्यात आली.ज्या रस्त्यांची कामे जूनपूर्वी पूर्ण होऊ शकतात,ती तातडीने पूर्ण करावीत.ज्या ठिकाणी कामे पूर्ण करणे शक्य नाही,तेथे तात्पुरत्या उपाययोजना करून वाहतूक सुरळीत ठेवण्याची खबरदारी घ्यावी,असे निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत जिल्ह्यात ७८ रस्त्यांची कामे प्रस्तावित असून,त्यापैकी आदिवासी वस्ती व पाड्यांना मुख्य रस्त्यांशी जोडणाऱ्या १० रस्त्यांची कामे मंजूर झाली आहेत.ही कामे प्राधान्याने हाती घेऊन पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे त्यांनी सांगितले.यावेळी वनविभागाच्या हद्दीतून जाणाऱ्या रस्त्यांसाठी आवश्यक असलेल्या मंजुरी प्रक्रियेत होणाऱ्या विलंबावरही चर्चा झाली.वनविभागाचे प्रस्ताव तत्काळ निकाली काढावेत,जिल्हा प्रशासन व बांधकाम विभागाने यासाठी संयुक्तपणे पाठपुरावा करावा,अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.ज्या प्रकरणांमध्ये मंजुरी प्रलंबित आहे; त्यावर तातडीने निर्णय घेऊन काम सुरू करावे,असेही त्यांनी स्पष्ट केले.रस्ते विकासाच्या अंमलबजावणीसाठी विभागीय समन्वय आवश्यक असून,सर्व संबंधित विभागांनी एकत्रित काम करावे,असे त्यांनी सांगितले.यासोबतच जिल्ह्यातील दूरसंचार सुलभतेच्या दृष्टीने प्रलंबित मोबाईल टॉवरच्या कामांचीही माहिती घेण्यात आली.या कामांमध्ये होणाऱ्या अडथळ्यांचे निराकरण करून इंटरनेट व संपर्क सुविधा अखंड ठेवण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणांनी घ्यावी,असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.बैठकीस मुख्य वनसंरक्षक रमेश कुमार,सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अध्यक्ष अभियंता निता ठाकरे,राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता ऋशिकांत राऊत आणि अप्पर जिल्हाधिकारी नितीन गावंडे तसेच इतर संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सतर्कता बाळगा..! नुकसानभरपाईच्या बहाण्याने शेतकऱ्यांकडून घेतले आधार कार्ड,पॅन कार्ड आणि सातबारे उतारे.. – अन् उचलले ७३ कोटींहून अधिकचे कर्ज..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-भोळ्या-भाबड्या,गरीब आणि अल्पशिक्षित शेतकऱ्यांना सरकारी योजनेअंतर्गत दरवर्षी दहा हजारांची नुकसाभरपाईची मदत मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांची कागदपत्रे मिळवली आणि त्यांच्याच नावावर...

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!