Thursday, April 30, 2026
Homeगडचिरोलीमुली नंतर काही तासातच वडिलांनीही घेतला गळफास... - गडचिरोली जिल्ह्यातील हृदयाला धडकी...

मुली नंतर काही तासातच वडिलांनीही घेतला गळफास… – गडचिरोली जिल्ह्यातील हृदयाला धडकी भरवणारी घटना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्याच्या मुलचेरा तालुक्यातील लक्ष्मीपूर येथे हृदयाला धडकी भरवणारी घटना उघडकीस आली आहे.प्रेमीयुगुलाने एकाच दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी ६ ऑक्टोंबर रोजी सायंकाळच्या सुमारास मुलचेरा तालुक्यातील लक्ष्मीपूर येथे उघडकीस आली होती.या घटनेचा पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात रवाना केले होते.अशातच आत्महत्या करणाऱ्या मुलीच्या विरहात पित्यानेही गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविल्याने एकच खळबळ उडाली.अमित अनिल रॉय वय ४० वर्षे, रा.विजयनगर असे मृत पित्याचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे की,मुलचेरा तालुक्यातील लक्ष्मीपूर येथील जयदेव मिलन मंडल वय २० वर्षे व विजयनगर येथील अमेला अमित रॉय वय १८ वर्षे हे प्रेमीयुगूल शनिवारी ५ ऑक्टोंबरला घरातून गायब झाले होते. दरम्यान रात्रीच्या सुमारास त्यांनी लक्ष्मीपूर येथील शेतकऱ्याच्या शेतातील झोपडीत गळफास लावून आत्महत्या केली.सदरची घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस येताच लक्ष्मीपूर गावात एकच खळबळ निर्माण झाली होती.मुलचेरा पोलिसांनी घटनास्थळ गाठत दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविले होते.अशातच मुलीने आत्महत्या केल्याची माहिती प्राप्त होताच पिता अमित अनिल रॉयही घरातून गायब झाले होते.मुलचेरा पोलिसांद्वारे त्यांचाही शोध घेतला जाता असताना मोबाल ट्रॅकिंगवरून त्यांचे लोकेशन सापडले.याअंतर्गत पोलिसांनी शोधमोहीम राबविली असता रविवारी त्याच रात्रीच्या सुमारास विजयनगर गावालगतच्या जंगलात झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला.
जयदेव मंडल व अमेला रॉय या प्रेमीयुगुलांनी तरुण वयात गळफास लावून आत्महत्या केल्यानंतर काही तासाच्या अवधीतच मुलीच्या चित्याला अग्नी न देताच मुलीच्या विरहात बापानेही आपली जीवनयात्रा संपविली.दोन कुटुंबातील तिघांचा जीव गेल्याने दोन्ही कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

“आपण लोकांची कामे करण्यासाठी बसलो आहोत; अडवणूक करण्यासाठी नाही”.. -सहपालकमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण मॅपिंग करून शासनाने स्वतः त्यांच्या दारात जाऊन गरजेनुसार योजनांचा लाभ द्यावा,अशी भूमिका कृषी राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष...

अखेर कुरखेडा नगरपंचायत सफाई कामगारांच्या बेमुदत संपावर तोडगा; संप मागे..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा नगरपंचायत अंतर्गत कार्यरत सफाई कामगारांंनी थकीत वेतनाकरीता मागील २३ एप्रीलपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते.त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण...

कायदा हा लवचिक आणि बदलत्या काळाशी सुसंगत असावा- सर्वोच्च न्यायालय – गर्भपाताची परवानगी दिली नाही; तर पीडितेच्या मनावर आयुष्यभर न पुसली जाणारी जखम आणि...

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच २४ एप्रिल २०२६ रोजी न्यायमूर्ती बी.व्ही.नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने एका १५ वर्षीय बलात्कार पिडीत तरुणीला ३० आठवड्यांचा...

बच्चू कडूंनी धनुष्यबाण घेतला हाती; शेतकरी,मजूर,दिव्यांगांसाठी निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दिव्यांग,शेतकरी आणि गोरगरिबांसाठी लढणारा 'रॉबिनहूड' नेता माजी मंत्री तथा प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!