- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५६ साली ऐतिहासिक दीक्षाभूमीवर लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली आणि धार्मिक अवडंबराद्वारे हजारो वर्षे प्रगतीची वाट रोखलेल्या शोषित,पीडितांना बुद्धाचा प्रकाश मिळाला.त्या ऐतिहासिक घटनेचे महत्त्व असलेल्या दीक्षाभूमीवर म्हणूनच दरवर्षी विविध राज्यांतील हजारो लोक धम्म दीक्षा ग्रहण करतात.यावर्षीही २५ राज्यांतील हजारो नागरिक दीक्षा ग्रहण करीत बुद्धाचा प्रकाशमार्ग धरणार आहेत.
ऐतिहासिक दीक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याला आता वेग आला आहे.वेगवेगळ्या कामांची जय्यत तयारी केली जात आहे.दीक्षाभूमीवर दरवर्षी धम्मचक्र वर्धापनदिन प्रवर्तन दिनाच्या सोहळ्यासह धम्मदीक्षेचाही कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर होतो.मागील काही वर्षांपासून भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या नेतृत्वातील भिक्खू संघ हे दीक्षाभूमीवर दीक्षा समारंभ आयोजित करतात. यात बौद्ध धम्माची दीक्षा घेण्यास इच्छुक असलेले लोक दीक्षा घेतात.त्यांना रीतसर बौद्ध धम्माचे प्रमाणपत्रही वितरित केले जाते.यंदासुद्धा मोठ्या
प्रमाणावर लोक दीक्षा घेणार आहेत.
राष्ट्रीय बौद्ध महासभा अंतर्गत यूपी,बिहार,झारखंड, जम्मू काश्मीर आदींसह २५ राज्यांतील हजारो लोक बौद्ध धम्माची दीक्षा घेणार आहेत.यासोबतच कर्नाटक येथून जवळपास ३५० बसेस भरून लोक दीक्षा घेण्यासाठी दीक्षाभूमीवर येणार आहेत.म्हैसूर कर्नाटक येथील सामाजिक कार्यकर्ते रविकीर्ती यांच्या नेतृत्वात कर्नाटकातून लोक दीक्षा घेण्यासाठी येणार आहेत.११ तारखेला ते पोहोचतील.१२ तारखेला बेझनबाग मैदानावर त्यांनी धम्म संमेलन आयोजित केले आहेत. तेथून ते दीक्षाभूमीवर रॅलीने येतील आणि दीक्षा घेतील. दीक्षाभूमीवरील यावर्षीचे मुख्य आकर्षण म्हणजे जपान येथील ५० लोकसुद्धा दीक्षाभूमीवर बौद्ध धम्माची दीक्षा घेणार आहेत.
- Advertisement -

