- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):- ‘भाऊ जेल मधुन केव्हा आला गां?’अशी विचारणा एका अवैध तंबाखू विक्रेत्याला केली असता,त्याने रागाने एकटक पाहून सर्व सत्यानाश होत आहे.एवून-जाऊन मलाच पकडतात.सर्वांना महिन्याचे पैसे देत आहे; तरीही पकडले जाते.तंबाखू विक्रेत्याने सांगितले की,ज्याला पैसे देतो त्याला म्हणालो,असे काऊन.तर अधिकारी म्हणाला “पैसे देत आहे,म्हणजे विकत घेतला आहे कां? तू खुलेआम धंदा करतो आमची काही इज्जत आहे की नाही.त्या ठिकाणी पत्रकार,पोलीस व लोकप्रतिनिधी असतांनाही धरला बोजा-बीस्तर अन् चालला विक्री करायला; अशी आपबिती एका अवैध तंबाखू विक्रेत्याने कथन केली.
देसाईगंज शहरासह तालुक्यात खुलेआम अवैध तंबाखू विक्री केली जातेय,पण होलसेल विक्रेत्यांना न पकडता चिल्लर खुर्दे वाल्यांना टार्गेट केले जाते. एखाद्याकडून जो पर्यंत महिना ठरत नाही,तोपर्यंत धरपकड अन् महिना सुरू होताच ‘जा जीले अपणी लाईफ’ ‘आम्ही खुश तर तू खुश’ आम्हीच खुश राहणार नाही,तर तू कसा काय खुश राहू शकतो,अशी डायलॉग झोडली जाते.त्यामुळेच अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर फोफावली आहेत.केवळ देसाईगंज शहर वा तालुक्यातच नाही,तर सर्वत्र हीच परिस्थिती पहावयास मिळत आहे.एखादा तंबाखू विक्रेता पकडल्यानंतर त्यातील मोठी साखळी कधी सापडली काय? ज्या होलसेल ठिकाणाहून तंबाखूची खरेदी केली जाते,अश्या ठिकाणी कधी धाड पडली काय?सर्व जागेवरच सेटलमेंट होत असल्याने कोण अंगाला हळद लावून घेणार?ही सांगण्याची गरज नाही,पण त्या अधिकाऱ्याचेही म्हणणे बरोबर आहे; “पैसे देत आहे, म्हणजे विकत घेतला आहे कां”..तू एकटाच कमाई करशील अन् आम्ही..भांडी घासायची कां?विशेष म्हणजे, एखादा कर्मचारी महिण्याकाठी पगार घेतो आणि त्याच्या आयुष्याची सर्व सेवा ही लोकसेवेत पणाला लावतो. शेवटच्या क्षणी एक घर बांधकाम,एक चारचाकी वाहन आणि मुलांचे लग्न करून ठणठण गोपाला होऊन बसतो. मात्र,अवैध धंदे करून अफाट मोहमाया गोळा करणाऱ्यांची व त्यांच्याकडून वसुली करणाऱ्यांची किमया ही न्यारीच म्हणावी लागेल.
- Advertisement -

