Wednesday, June 24, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तबारा नक्षल्यांचा खात्मा तर तीन जवान शहीद..

बारा नक्षल्यांचा खात्मा तर तीन जवान शहीद..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-छतीसगडच्या बिजापूर जिल्ह्यातील गंगलूर पोलिस स्टेशन हद्दीतील घनदाट जंगल परिसरात आज,बुधवार ३ डिसेंबरला सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये उडालेल्या चकमकीत बारा नक्षलवाद्यांचा खात्मा तर तीन जवान शहीद झाले. नक्षलवाद्यांचे बाराही मृतदेह जवानांनी ताब्यात घेतले असून परिसरात शोधमोहीम सुरू आहे.चकमकीच्या ठिकाणाहून एसएलआर रायफल,३०३ रायफल आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.त्याचबरोबर,मृत नक्षलिंचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
आज बुधवारी जिल्हा राखीव पोलीस दल,केंद्रीय राखीव पोलीस दलासह इतर सुरक्षा दलांचे संयुक्त पथक गंगलूरच्या जंगल परिसरात शोधमोहीम राबवत होते.यादरम्यान,नक्षलींनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला.याला सुरक्षा दलांनी चोख प्रत्युत्तर दिले.आज सकाळपासूनच चकमक सुरू होती.गंगलूर हा नक्षलवादाच्या दृष्टीने संवेदनशील परिसर म्हणून ओळखला जातो.परिसरात नक्षली कमांडर पापा रावचे वर्चस्व असल्याचे बोलल्या जाते.चकमकीत सुरक्षा दलाचे तीन जवान शहीद झाले आहेत.तिन्ही जवान जिल्हा राखीव पोलीस दलात कार्यरत होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कोंढाळा ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक “एकल महिला दिन” साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):- कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचे म्हणजेच एखाद्या महिलेच्या पतीचे निधन झाल्यास एकटेपणाच्या काळात महिलांना सहन करावा लागणारा सामाजिक,आर्थिक व इतर त्रास किती चटके लावणारा असतो;...

कुरखेडा तालुक्याच्या मालेवाडा येथे स्थापन होणार नवीन अप्पर तहसील कार्यालय.. – नागरिक,ग्रामपंचायती आणि संस्थांकडून हरकती व सूचना नोंदविण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्याच्या मालेवाडा येथे नवीन अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून,याबाबत नागरिक,ग्रामपंचायती आणि संस्थांकडून हरकती व सूचना...

उमेद अंतर्गत तयार होणाऱ्या उत्पादनांना मिळणार एकसंध ओळख.. – ‘गडचिरोली ब्रँड’साठी लोगो व टॅगलाईन पाठवा अन् जिंका ३० हजार रुपयांची बक्षिसे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान(उमेद)अंतर्गत स्वयं सहाय्यता समूह (SHG), उत्पादक गट(PG)आणि महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून (FPO)तयार करण्यात येणाऱ्या विविध उत्पादनांना एकसंध...

शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाकडून दखल.. – तीन प्रगतशील शेतकऱ्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील तीन प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाने दखल घेत सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठीचा प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!