Saturday, June 20, 2026
Homeनागपूरबँक अध्यक्षपदाच्या अपात्रता प्रकरणी बच्चू कडूंना दिलासा.. - मुंबई उच्च न्यायालयाच्या...

बँक अध्यक्षपदाच्या अपात्रता प्रकरणी बच्चू कडूंना दिलासा.. – मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा मोठा निर्णय..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :-माजी राज्यमंत्री तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीसह विविध १७ मागण्यांसाठी ८ जून २०२५ पासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते.विरोधी पक्षातील नेत्यांसह विविध संघटनांनी बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला होता.त्यानुसार  आंदोलनाची महायुती सरकारने दखल घेत बच्चू कडू यांना लेखी आश्वासन दिल्याने शनिवार १४ जून रोजी अन्नत्याग आंदोलन आणि चक्का जाम आंदोलन स्थगित करीत करण्यात आले होते.आंदोलन स्थगित करताच बच्चू कडू यांना अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून १६ जून रोजी अपात्र ठरविण्यात आले होते.बच्चू कडू यांच्याविरुद्ध २०१७ मध्ये नाशिक येथील एका आंदोलनप्रकरणात सुकरवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.शासकीय कामात अडथळा आणि मारहाण केल्यावरून न्यायालयाने त्यांना एक वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली होती.अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नियमानुसार,बँकेच्या संचालकाला न्यायालयाने एक वर्षापर्यंतची शिक्षा सुनावल्यास त्याला पदावर राहता येत नाही.हीच बाब पुढे करीत बँकेच्या विरोधी गटातील बारा संचालकांनी हरिभाऊ मोहोड यांच्या नेतृत्वाखाली बच्चू कडू यांना अपात्र ठरविण्याची मागणी केली होती.सहकार विभागाचे विभागीय सहनिबंधक प्रवीण फडणीस यांनी या तक्रारीची दखल घेत बच्चू कडू यांना नोटीस बजावली होती.यानंतर बच्चू कडू यांना त्यांचे म्हणणे मांडण्यास सांगण्यात आले होते.याआधारे सहनिबंधकांनी त्यांना अपात्र ठरविण्याचा निर्णय घेतला होता.शिवाय त्यांना पाच वर्षांपर्यंत बँकेची कोणतीही निवडणूक लढता येणार नव्हती.याविरुद्ध बच्चू कडू यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले होते. यावर आज,मंगळवार २४ जून रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सुनावणी झाली. सुनावणीत न्यायालयाने विभागीय सहनिबंधकांच्या आदेशाला स्थगिती दिली आहे.यामुळे बच्चू कडू यांना मोठा दिलासा मिळाला आहे.न्यायालयाने अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून दिलेला निर्णय हा सत्याचा विजय आहे,अशा शब्दांत बच्चू कडू यांनी न्यायालयाच्या निकालाचे स्वागत केले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागभीड तालुक्यातील गिरगाव येथे आज,शुक्रवार १९ जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.आत्माराम दसरू बोरकर...

कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच नक्षली समर्थक पोलिसांच्या तावडीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-तब्बल अकरा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा नक्षल समर्थक अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला.विशेष म्हणजे,कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच त्यास अटक करण्यात आली.त्याचा शोध...

देसाईगंजात सुगंधित तंबाखूविक्री जोमात; आरमोरीत अवैध सट्टा-पट्टी,तर कुरखेड्यात दारूचा महापूर..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात अवैध धंद्यांनी डोके वर काढले असून देसाईगंज शहर व तालुक्यात सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री,तर आरमोरी शहरापासून ते ग्रामीण...

जीएसटी नंबर मिळवून दिले नं..! आता दहा हजार द्या.. – राज्यकर निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!