Friday, May 8, 2026
Homeमुंबईनक्षलग्रस्त भागातील सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने सीआरपीएफ कॅम्पसाठी २ हेक्टर...

नक्षलग्रस्त भागातील सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने सीआरपीएफ कॅम्पसाठी २ हेक्टर जमीन.. – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागातील सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली येथील सर्व्हे नं.१५९/२ मधील एकूण ६.९८ हेक्टर क्षेत्रापैकी २ हेक्टर(१० एकर) शासकीय जमीन सीआरपीएफ म्हणजेच केंद्रीय राखीव पोलीस बल(CRPF)कॅम्प उभारण्यासाठी पोलीस अधीक्षक,गडचिरोली यांना मंजूर करण्यात आली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला आहे.
महसूल विभागाने दिलेली ही जमीन मंजुरी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ चे कलम २०,३१ व ४० तसेच महाराष्ट्र जमीन महसूल(सरकारी जमीनीचे विल्हेवाट लावणे)नियम १९७१ चे कलम ५ व ६ मधील तरतूदींन्वये महसूल मुक्त व सारामाफीने देण्यात आली आहे.त्यासाठी शासनाने काही अटीही घातल्या आहेत.या जमिनीसाठी असलेल्या अटी व शर्तींनुसार,अर्जदार संस्था ही जमीन भोगवटादार वर्ग-२ या धारणाधिकाराने धारण करेल.शासनाच्या पूर्वमान्यतेशिवाय या जमिनीची विक्री, गहाण,हस्तांतरण किंवा पोटविभागणी करता येणार नाही.तसेच या जमिनीचा वापर केवळ मंजूर प्रयोजनासाठीच करणे बंधनकारक असून इतर कोणत्याही वापरासाठी शासनाची पूर्वपरवानगी आवश्यक राहील.जिल्हाधिकाऱ्यांनी सदर जमीन वन जमीन नसल्याची खातरजमा करणे आवश्यक असून वन विभागाचे अभिप्राय प्राप्त करून घेऊन जमिनीचा ताबा मिळाल्यापासून दोन वर्षांच्या आत मंजूर कामासाठी बांधकामास सुरुवात करणे बंधनकारक राहील,तसेच नियोजन प्राधिकरणांच्या नियमांनुसारच विकास करणे अनिवार्य असेल.याशिवाय,राज्य व केंद्र शासनाच्या सुरक्षेविषयक वेळोवेळी येणाऱ्या आदेशांचे पालन करणे, लगतच्या खातेदारांच्या वहीवाटीस बाधा न आणणे आणि पोच रस्ता उपलब्ध करून देणे बंधनकारक असून वरील कोणत्याही अटीचा भंग झाल्यास सदर जमीन शासनजमा करण्याचा अधिकार सरकारकडे राहील.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अन् धावत्या बसने क्षणांतच घेतला पेट; जीवितहानी टळली..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-तब्बल ४० पेक्षा अधिकचे प्रवासी घेऊन गडचिरोलीवरून चंद्रपूरकडे निघालेल्या एका इलेक्ट्रिक बसला अचानकपणे भीषण आग लागल्याची घटना आज,शुक्रवार ८ मे रोजी...

येत्या सोमवारपासून अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया.. – शैक्षणिक वर्ष २०२६-२७ चे वेळापत्रक जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग-१ आणि भाग-२ भरण्याची सुविधा येत्या,सोमवार ११ मे...

पोलिसांना न्यायालयात बिनशर्त मागावी लागली माफी.. – महिलेच्या घरात प्रवेश केल्याचे प्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-पोलिसांना सर्वकाही माहित असतांनाही काही पोलीस अधिकारी आणि कर्मचारी अंगात 'पोलीसगिरी' चा रोप झाडतांना दिसून येतात.मात्र,यांस काहीजण अपवादही आहेत.पोलीस खाते हे...

दहावीचा निकाल जाहीर; निकालात दोन टक्क्यांची घसरण..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकताच शनिवार,२ मे २०२६ रोजी बारावीचा निकाल जाहीर झाला होता.बारावीत महाराष्ट्र राज्याचा ८९.७९ टक्के एकूण निकाल  लागला होता.यात मुलींनीच बाजी मारून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!