- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या जिवती तालुक्यातील नगराळा येथील अमरू नाईक माध्यमिक आश्रमशाळेत उघडकीस आली.घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या जेवणाच्या गुणवत्तेसह स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
जिवती तालुक्याच्या नगराळा येथील अमरु नाईक माध्यमिक आश्रमशाळेत परिसरातील कुंभेझरी, पारधीगुडा,नागलोन,नोकेवाडी,पेदा,आकसापूर, नगराळा,शंकर लोधी,नागपाडा आदी गावांतील विद्यार्थी इयत्ता १ ते १० वी पर्यंत शिक्षण घेतात.येथे ५० विद्यार्थी निवासी असून आज सकाळच्या सुमारास डाळभाजी तयार करण्यात येत होती.त्याचवेळी डाळभाजीच्या भांड्यात जिवंत पाल पडले.मात्र,स्वयंपाक करणाऱ्या कर्मचाऱ्यांना याची कल्पनाच नव्हती. विद्यार्थी जेवणासाठी बसले आणि विद्यार्थ्यांनी काही अन्न खाल्ले. मात्र,डाळभाजी वाढत असतांना विद्यार्थ्यांना त्यात पालीचे लहान-मोठे तुकडे दिसून आले.दरम्यान,काही विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याने त्यांना तातडीने जिवती ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर विद्यार्थ्यांना पुढील उपचारार्थ राजुरा उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.उपचार घेत असलेल्या विद्यार्थ्यांची सध्या प्रकृती स्थिर असून विद्यार्थ्यांवर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांना होताच पालकांनी रुग्णालयाकडे धाव घेतली.प्रकरणाची चौकशी पोलीस प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे.
- Advertisement -

