- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-थंडीचा जोर कायम राहणार असून देशाच्या उत्तरेकडील पर्वतांवर झालेल्या बर्फवृष्टीमुळे आणि पश्चिमी वाऱ्यांच्या प्रवाहामुळे मैदानी भागातील किमान तापमान खाली आले आहे.यामुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातही थंडीचा जोर वाढला आहे.दिल्ली,उत्तर प्रदेश,पंजाब,हरियाणा आणि राजस्थान या राज्यांत थंडीच्या तीव्र लाटेची शक्यता आहे.यातील काही भागांसाठी ‘रेड अलर्ट’ आहे.भारतीय हवामान विभागानुसार,थंडीच्या लाटेचा परिणाम हा विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये अधिक दिसून येत आहे. नागपूर,गोंदिया आणि यवतमाळ जिल्ह्यांत शीत लहरीचा इशारा आहे.नागपूर, गोंदियामध्ये किमान तापमान ९ ते १० अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदवले गेले आहे.मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात काही भागांमध्ये पारा १० अंशांच्या खाली उतरला आहे.मुंबईतही तापमानाचा पारा घसरला असून सकाळी आणि संध्याकाळी हलका गारवा जाणवत आहे.पुण्यात किमान तापमान १३ अंश सेल्सिअसच्या आसपास तर नाशिकमध्ये १२ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे.राज्यातील तापमानात होणारा बदल चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाल्यामुळे आणि उत्तरेकडील वाऱ्यांचा प्रवाह वाढल्यामुळे आहे. चालू डिसेंबर महिन्यात राज्यात थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता आहे.
- Advertisement -

