उद्रेक न्युज वृत्त :-जातनिहाय जनगणना दर दहा वर्षांनी घेतली जावी,अशी कायदेशीर तरतूद आहे.मात्र,केंद्र सरकारने नुकतेच जनगणना घेण्यासंदर्भात माहिती दिली होती.त्यामध्ये,जातनिहाय जनगणना घेण्यात येणार असल्याचे केंद्राने स्पष्ट केले होते.बुधवार ३० एप्रिल २०२५ ला केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली होती.पार पडलेल्या बैठकीत केंद्र सरकारने देशभरात जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला असल्याचे केंद्रीय रेल्वे तथा देशाचे माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेत सर्वंकष माहिती जाहीर केली होती.त्यामुळे येत्या काळात जातनिहाय जनगणना झाल्यास एकूण जाती,हल्ली दिलेले आरक्षण व इतर सर्व बाबी स्पष्ट होऊन अनेकांवर होणारा अन्याय संपुष्टात येणार आहे.त्यानुसार आता जनगणना करण्याची तारीख पुढे आली असून देशात १ मार्च २०२७ पासून जनगणनेला सुरुवात होणार आहे. देशभरात दोन टप्प्यात ही जनगणना केली जाणार असून डोंगराळ भागात म्हणजेच लडाख,जम्मू काश्मीर,हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड येथून सुरुवात होणार आहे.हिमाचल प्रदेश, उत्तराखंड,तसेच केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीर आणि लडाख या भागांत विशेष बाब म्हणून १० ऑक्टोंबर २०२६ ला जनगणना सुरू होणार आहे.देशात या अगोदरची जनजगणना काँग्रेस सरकार असतांना झाली होती.सन २०११ मध्ये देशात जनगणना झाली होती.त्यानंतर २०२१ मध्ये जनगणना होणे अपेक्षित होते.मात्र,देशभरात कोरोनाची महामारी असल्याने २०२१ मध्ये जनगणना घेण्याचा निर्णय झाला नाही.त्यामुळे, आता २०२७ पासून जनगणनेला सुरुवात होत असल्याने तब्बल १६ वर्षांनी जातनिहाय जनगणना होणार आहे.
तब्बल १६ वर्षांनी होणार जातनिहाय जनगणना; ‘या’ तारखेपासून होणार सुरुवात..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

