Monday, May 25, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तटीम इंडियाने विश्वषचषकात विजयाचा चौकार लगावला..- टीम इंडियाने ७ गडी राखून बांगलादेशवर मोठा...

टीम इंडियाने विश्वषचषकात विजयाचा चौकार लगावला..- टीम इंडियाने ७ गडी राखून बांगलादेशवर मोठा विजय मिळवला…..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- विश्वचषकातील १७ वा सामना बांगलादेश विरुद्ध टीम इंडियाचा रोमहर्षक सामना झाला. या सामन्यात बांगलादेशने दिलेले २५७ धावांचे आव्हान टीम इंडियाने सहज पार केले. टीम इंडियाने ७ गडी राखून बांगलादेशवर मोठा विजय मिळवला.

बांगलादेश प्रथम फलंदाजी करत भारताला २५७ धावांचे आव्हान दिले होते.बांगलादेशने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्मा,शुबमन गिल,विराट कोहलीने दमदार खेळी खेळली. बांगलादेशने दिलेले आव्हान भारताने ४१.३ षटकात तीन गडी गमावून पूर्ण केले.या डावात विराट कोहलीने शानदार शतक ठोकले.

विराट कोहलीने ९७ चेंडूत नाबाद १०३ धावा केल्या.या शतकात ६ चौकार आणि ४ षटकारांचा सामावेश आहे.तर केएल राहुलने ३४ चेंडूत ३ चौकार आणि १ षटकार ठोकून ३४ धावा कुटल्या.कोहली आणि राहुलने चौथ्या गडीसाठी ८३ धावांची नाबाद भागीदारी रचली.बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना लिटन दासच्या अर्धशतकाच्या जोरावर ५० षटकात ८ गडी गमावून २५६ धावा चोपल्या.बांगलादेशच्या तंजीद हसन आणि लिटन दासने पहिल्या विकेटसाठी ९३ धावा कुटल्या.तंजीद खान ५१ धावांवर पायचीत झाला.तर लिटने ८२ चेंडूत ६६ धावा कुटल्या.महमूदुल्लाहने ४६ धावांचे योगदान दिले.बांगलादेशच्या लिटन दासने सर्वाधिक ६६ धावा कुटल्या.तर भारतासाठी मोहम्मद सिराज,जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जडेजाने प्रत्येकी २-२ गडी बाद केले.या विजयामुळे टीम इंडियाने विश्वषचषकात विजयाचा चौकार लगावला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागरिकांनो जीवाची काळजी घ्या; आजपासून नवतपाला सुरुवात.. – सर्वाधिक तापमानाचे नऊ दिवस..

उद्रेक न्युज वृत्त :-काही दिवसांपासून सूर्यदेवता विदर्भातील जीवसृष्टीवर कोपला की काय?अशी स्थिती निर्माण झाली आहे.सूर्य मोठ्या प्रमाणावर आग ओकू लागल्याने विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये उष्ण...

नागरिकांनी लोकशाही दिनात तक्रारी व निवेदने सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन  येत्या,सोमवार १ जून २०२६ रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथील सभागृहात करण्यात आले आहे.जिल्ह्यातील नागरिकांनी...

देशात जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली; पण ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकानाच नाही.. देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर धडकणार ‘भव्य मोर्चा’..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- "आमची संख्या,आमचा हक्क,आमचा सन्मान!" आणि "जनगणनेत स्वतंत्र कॉलम,आमचा हक्क!" अशी गगनभेदी गर्जना करत देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात...

रोजगार हमी योजनेच्या कायद्याची जागा घेणाऱ्या ‘व्हीबी-जी राम जी’ योजनेत १२५ दिवस काम देण्याची हमी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच कालावधीपासून सुरू असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-२००५ कायद्याची जागा आता 'विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजिविका...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!