- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-सध्या नवतपाचे दिवस सुरू आहेत.२५ मे २०२६ पासून सुरू झालेली सूर्याची दाहकता २ जून २०२६ पर्यंत राहणार आहे.अश्यातच भयंकर तापणाऱ्या नवतप्याने काल शनिवारी नागपुरात तिघांचा जीव घेतल्याने अवघ्या चार दिवसांत उष्माघातामुळे तब्बल १८ जणांचा मृत्यू झाला आहे.या तिघांचे मृतदेह शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी आढळून आले आहेत. जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खोब्रागडे चौकाजवळील जयदीप सोसायटीसमोर पदपथावर सकाळी एक व्यक्ती बेशुद्धावस्थेत आढळून आला.त्याला तातडीने मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.यापूर्वी जरीपटक्यातील एका बसथांब्याजवळ एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत आढळला होता.त्याला रुग्णालयात नेत असतांनाच त्याचा मृत्यू झाला,तर तिसरा मृतदेह सीए रोडवरील एका दागिन्यांच्या दुकानासमोर रस्त्यावर पडलेल्या अवस्थेत आढळून आला.तिन्ही मृतांची ओळख पटलेली नाही.पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.मात्र,वाढत्या उन्हामुळेच यांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. नवतपाचा कार्यकाळ २ जून रोजी संपुष्टात येणार असल्याने हवामान विभागाच्या निरीक्षणानुसार येत्या २४ तासांत आज,रविवार ३१ मे पर्यंत नागपूरसह विदर्भाच्या काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.पावसाळी वातावरण ३ जूनपर्यंत राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे तापमानात आणखी दोन ते चार अंशांची घट होईल,असा अंदाज आहे.
- Advertisement -

