- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
छत्रपती संभाजीनगर :-पूर्वीचे औरंगाबाद व आताचे छत्रपती संभाजीनगर नावाने उदयास आलेल्या जिल्ह्यात चक्क उपजिल्हाधिकारीच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्याची घटना काल,मंगळवार २७ मे रोजी दुपारच्या सुमारास जिल्हा कचेरीसमोर घडली.निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांनी तक्रारदाराकडे ४१ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.यातील पहिल्या टप्प्यातील २३ लाख रुपये संबधित तक्रारदाराकडून आधीच घेतले होते.त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात १८ लाखांची पुन्हा मागणी करण्यात आली.अश्यातच दुसऱ्या टप्प्यातील १८ लाखापैकी ५ लाख रुपयांची लाच अव्वल कारकुन दिलीप त्रिभुवन मार्फत घेण्यात येत असतांनाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडुन उपजिल्हाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले.त्यानंतर एसीबीने लाचखोर उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकरच्या घरी धाड टाकली असता मोठे घबाड सापडले आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने विनोद खिरोळकर यांच्या घरातून तब्बल १३ लाख ६ हजार ३८० रुपयांची रोकड,५० लाख ९९ हजार ५८३ रुपयांचे ५८९ ग्रॅम म्हणजेच ५९ तोळे सोन्याचे दागिने, तसेच ३ लाख ३९ हजार ३४५ रुपय किंमतीचे ३ किलो ५५३ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने,यांसह इतर काही मौल्यवान वस्तू आणि रोख रक्कम असा एकूण ६७ लाख ४५ हजार ३०८ रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
काय आहे प्रकरण👇
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
तक्रारदार आणि त्यांचे सहकारी यांनी छत्रपती संभाजीनगर परिसरातील तिसगाव येथे ६ हजार १६ गुंठे वर्ग-२ मधील जमीन नियमानुसार घेतली.रजिस्ट्री खरेदीखतही करून घेतले.वर्ग-२ मधील जमीन वर्ग-१ मध्ये करून देण्यासाठी नियमानुसार शासनाकडे काही रक्कम भरावी लागते.या प्रक्रियेसाठी खिरोळकर आणि त्रिभुवन यांनी यापूर्वी २३ लाख रुपये घेतले. पुन्हा चलन देण्यासाठी १८ लाख रुपयांची मागणी केली.त्यातील पाच लाख रुपये काल,मंगळवारी २७ मे रोजी देण्याचे ठरले होते.अश्यातच फटाका फुटला आणि निवासी उपजिल्हाधिकारी अडकला.
- Advertisement -

