Sunday, April 19, 2026
Homeगडचिरोलीविजेच्या तडाख्यापासून 'असा' करा स्वतःचा बचाव; प्रशासनाकडून महत्त्वपूर्ण सूचना..!

विजेच्या तडाख्यापासून ‘असा’ करा स्वतःचा बचाव; प्रशासनाकडून महत्त्वपूर्ण सूचना..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर विजेचा कडकडाट आणि अंगावर वीज पडण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी,असे आवाहन गडचिरोली जिल्हा प्रशासनाने केले आहे.यासाठी प्रशासनाने काही महत्त्वाच्या सूचना केल्या असून,त्याचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रशासनाच्या सूचनेनुसार,विजेचा धोका टाळण्यासाठी शेतात काम करणाऱ्यांनी किंवा तलावात कार्यरत असलेल्या व्यक्तींनी त्वरीत कोरड्या व सुरक्षित स्थळी आसरा घ्यावा.शेतात काम सुरू असतांना वीज पडण्याची शक्यता असल्यास सुरक्षित स्थळी पोहचण्याचा प्रयत्न करावा,अन्यथा जिथे आहात तिथेच थांबावे.अशा वेळी पायाखाली लाकूड, प्लास्टिक, गोणपाट अथवा कोरडा पाला ठेवावा आणि दोन्ही पाय एकत्र करून गुडघ्यावर हात ठेवून डोके जमिनीकडे झुकवावे,मात्र डोके जमिनीला लागू नये.
प्रशासनाने धातूपासून बनलेल्या कृषी यंत्र,लोखंडी पाईप यांसारख्या वस्तूंपासून दूर राहण्याचे निर्देश दिले आहेत.तसेच शेत,गाव,घर,बागेभोवती लोखंडी तारांचे कुंपण न घालण्याचा सल्ला देण्यात आला आहे.कारण अशा तारांमुळे वीज सहजतेने आकृष्ट होते.धातूच्या दांडीची छत्री वापरणे,विजेच्या खांबाजवळ उभे राहणे, झाडाखाली अथवा उंच जागेवर जाणे टाळावे.
घरात असतांना विजेवर चालणारी उपकरणे,पाण्याचे नळ,टेलिफोन,फ्रिज यांना स्पर्श न करता त्यांच्यापासून दूर राहावे.कपडे वाळविण्यासाठी विजेवर न ठेवता सुतळीचा वापर करावा.प्रशासनाने घरोघरी वीज अटकाव यंत्रणा बसवण्याचा सल्लाही दिला आहे.
वृक्षांच्या सुरक्षेसाठी तांब्याची एक तार झाडाच्या फांदीवर बांधून तिचे दुसरे टोक जमिनीत खोलवर पुरण्याची सूचना देण्यात आली आहे.त्यामुळे वीज झाडावर न पडता सुरक्षिततेची हमी मिळते.वाहनातून प्रवास करत असतांना वीज सुरू असल्यास शक्यतो वाहनातच थांबावे.वाहनाच्या बाहेर राहण्याची गरज भासल्यास,कोणतेही धातूचे उपकरण हातात न ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.जंगलात असाल तर उंच झाडांपासून दूर राहून कमी उंचीच्या झाडांचा आसरा घ्यावा.पाण्याचे स्त्रोत, दलदलीची ठिकाणे,अथवा मोकळ्या जागा टाळाव्यात.मात्र मोकळ्या आकाशाखालीच राहणे भाग असल्यास खोलगट जागेचा निवास करावा. एकाच जागी अनेक व्यक्ती एकत्र उभे राहू नयेत,दोन व्यक्तींमधील अंतर किमान १५ फूट असावे.पाण्यात पोहत असलेल्यांनी अथवा मासेमारी करत असलेल्यांनी तात्काळ बाहेर यावे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्त्वाची; सर्व शैक्षणिक संस्था सकाळच्या सत्रात सुरू ठेवण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-दिवसेंदिवस उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.अश्यातच चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाची...

चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच उडाला भडका; पतीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-स्वयंपाकघरातील गॅस लिकेज असल्याने चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच आगीचा अचानकपणे भडका उडाला आणि काही क्षणातच सिलिंडरचा जोरदार स्फोट झाला.दरम्यान,संपूर्ण घरात...

वाहनधारकांसाठी दिलासा; गडचिरोली शहरातील ट्रॅफिक सिग्नल काही वेळासाठी राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदर्भातीलच नव्हे तर राज्याच्या विविध जिल्ह्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने जीवाची लाहीलाही होत आहे.अश्यातच शहरातील महत्त्वाच्या...

उष्णतेची तीव्रता; प्रखर उन्हामुळे शेतातच पडली बेशुद्ध.. – शेतकरी महिलेचा मृत्यू; नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उष्णतेचा पारा चढल्याने आरोग्य विभागासह प्रशासन सतर्क झाले आहे.त्यातच,नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहे.विशेष म्हणजे,दुपारी १२...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!