Sunday, April 19, 2026
Homeछत्रपती संभाजी नगरमोबाईल टॉवर उभारण्यासाठी नियमबाह्य परवानगी देणे ग्रामपंचायतीला चांगलेच भोवले…- सरपंच, उपसरपंचासह १७...

मोबाईल टॉवर उभारण्यासाठी नियमबाह्य परवानगी देणे ग्रामपंचायतीला चांगलेच भोवले…- सरपंच, उपसरपंचासह १७ सदस्य अपात्र..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

छत्रपती संभाजीनगर :- जिल्ह्यातील वाळूज ग्रामपंचायतीला खाजगी कंपनीला मोबाईल टॉवर उभारण्यासाठी नियमबाह्य परवानगी दिल्याचे प्रकरण चांगलेच भोवले आहे.नियमबाह्य परवानगीमुळे अख्खी ग्रामपंचायतच विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड यांच्या आदेशाने अपात्र ठरविण्यात आली आहे.सरपंच,उपसरपंच यांच्यासह १७ सदस्यांचा यात समावेश आहे.

जिओ डिजिटल फायबर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने दोन वर्षांपूर्वी वाळूजला फायबर केबल व नवीन मोबाईल टॉवर उभरण्यासाठी ग्रामपंचायतीकडे ना हरकत प्रमाणपत्र मिळण्यासाठी प्रस्ताव दाखल केला होता.त्या नंतर ग्रामपंचायतने कंपनीला टॉवर उभारण्याची परवानगी दिली.या विरोधात रहिवासी भैय्यासाहेब चव्हाण यांनी शाळेपासून शंभर मीटरच्या अंतरावर टॉवर उभरण्यास परवानगी देताना ग्रामपंचायतीने कोणताही ठराव घेतला नाही; अशी तक्रार विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड यांच्याकडे केली होती.विभागीय आयुक्तांनी सरपंच उपसरपंच यांच्यासह १७ सदस्यांना अपात्रतेची कारवाई केली तसेच ग्रामसेवक यांच्या शिस्तभंगाची कारवाई केली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्त्वाची; सर्व शैक्षणिक संस्था सकाळच्या सत्रात सुरू ठेवण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-दिवसेंदिवस उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.अश्यातच चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाची...

चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच उडाला भडका; पतीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-स्वयंपाकघरातील गॅस लिकेज असल्याने चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच आगीचा अचानकपणे भडका उडाला आणि काही क्षणातच सिलिंडरचा जोरदार स्फोट झाला.दरम्यान,संपूर्ण घरात...

वाहनधारकांसाठी दिलासा; गडचिरोली शहरातील ट्रॅफिक सिग्नल काही वेळासाठी राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदर्भातीलच नव्हे तर राज्याच्या विविध जिल्ह्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने जीवाची लाहीलाही होत आहे.अश्यातच शहरातील महत्त्वाच्या...

उष्णतेची तीव्रता; प्रखर उन्हामुळे शेतातच पडली बेशुद्ध.. – शेतकरी महिलेचा मृत्यू; नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उष्णतेचा पारा चढल्याने आरोग्य विभागासह प्रशासन सतर्क झाले आहे.त्यातच,नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहे.विशेष म्हणजे,दुपारी १२...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!