Saturday, June 13, 2026
Homeछत्रपती संभाजी नगरविजांचा तांडव; अंगावर विज पडून एकाच तालुक्यातील चार जणांचा मृत्यू.. - दोन...

विजांचा तांडव; अंगावर विज पडून एकाच तालुक्यातील चार जणांचा मृत्यू.. – दोन सख्ख्या भावंडांचा मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
छत्रपती संभाजीनगर :-जिल्ह्यात पेरणीयोग्य पाऊस कोसळल्याने बऱ्याच ठिकाणी शेतकरी शेतबांधावर जाऊन पेरणी करू लागलेत.अश्याच प्रकारे आज, शनिवार १४ जून रोजी पेरणी व इतर कामे करण्यासाठी शेतबांधावर गेलेल्या एकाच तालुक्यातील चार जणांचा अंगावर विज पडून मृत्यू झाल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली.चार जणांपैकी दोन सख्ख्या भावांचाही वीज पडून मृत्यू झाला आहे.सदरच्या घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या सिल्लोड तालुक्यात घडल्या.
पहिल्या घटनेत सिल्लोड तालुक्याच्या सारोळा गावातील दोन सख्ख्या भावंडांचा अंगावर विज कोसळून मृत्यू झाला आहे.दोन्ही भावंडे आपल्या आईसह शेतात पेरणीसाठी गेली होती.शेतात उभे असतांना अचानकपणे पावसाने हजेरी लावली. त्यामुळे ते एका झाडाच्या आडोशाला गेले.तितक्यातच विजांचे कडकडाट सुरू होऊन वीज दोघांच्याही अंगावर कोसळली.यात रोहित राजू काकडे वय २१ वर्षे व यश राजू काकडे वय १७ वर्षे हे दोघेही जागीच गतप्राण झाले.
दुसऱ्या घटनेत सिल्लोड तालुक्याच्या मोढा बुद्रूक येथे दुपारी दोन वाजेच्या सुमारास विजांचा कडकडाट सुरू झाल्यानंतर शेतातून घरी जात असतांना ४८ वर्षीय रंजना बापू शिंदे यांचा वीज कोसळून मृत्यू झाला.
तिसऱ्या घटनेत सिल्लोड तालुक्याच्या पिंपळदरी गावातील दोघे भाऊ शेतात कामे करीत असतांनाच अचानकपणे विजांचे कडकडाट होऊन २८ वर्षीय
शिवराज सतीश गव्हाणे याच्या अंगावर वीज कोसळली.त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला तर भाऊ जीवन सतिश गव्हाणे गंभीर जखमी झाला.त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.आज शनिवारी एकाच तालुक्यातील चार जणांचा अंगावर वीज कोसळून मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली आहे.त्यातच अन्वी शिवारातील शेतकरी नारायण सांडू बांबर्डे यांच्या शेतात वीज कोसळून एक म्हैस ठार झाली.तर दुसऱ्या घटनेत मांडणा येथील शेतकरी ज्ञानेश्वर माणिकराव लोखंडे यांच्याही शेतात वीज कोसळून तीन वासरे ठार झालीत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

त्वरा करा..! रेशन दुकानातून तांदूळ अन् गहू उचलण्यासाठी उरले केवळ दोनच दिवस..

उद्रेक न्युज वृत्त :-गरजू नागरिकांना पुरवठा विभागातर्फे स्वस्त धान्य दुकानांमधून धान्य वितरण करण्यात येते.मे व जून महिन्याचे धान्य वाटप करण्याची अंतिम तारीख १५ जून...

खर्रा खाणाऱ्यांनो सावधान..! बाजारात नकली तंबाखूचा शिरकाव.. – मशीनच्या सहाय्याने नकली तंबाखू तयार करणाऱ्यासह ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विदर्भातील बऱ्याचश्या जिल्ह्यात आजही जवळपास ७० ते ८० टक्के लोकं खर्रा खाण्याचे शौकीन आहेत.तंबाखूची वाढती मागणी लक्षात घेता "मरणारे मरोत आणि...

देसाईगंज शहरातील पाणी पुरवठा योजनेचे काम संथगतीने करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाईची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत देसाईगंज शहरात कोट्यवधी रुपयांचे पाणी पुरवठा योजनेचे बांधकाम संथगतीने सुरू असल्याने कामाच्या विलंबामुळे शहरातील नागरिकांना पिण्याच्या...

बांधकाम कामगार योजनांचा लाभ घेण्यासाठी ९० दिवस काम केल्याचे बनावट प्रमाणपत्र; ११ जणांवर गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कंत्राटदार,ऑनलाइन सेवा केंद्र संचालक व एजंट यांच्या संगनमताने करण्यात आलेल्या बोगस कामगार नोंदणीचे रॅकेट उघडकीस येताच तब्बल ११ जणांवर गुन्हे दाखल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!