Sunday, April 19, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तअखेर लिखित आश्वासनानंतर आज बच्चू कडूंचे आंदोलन स्थगित.. - शेतकरी कर्जमाफीसह विविध...

अखेर लिखित आश्वासनानंतर आज बच्चू कडूंचे आंदोलन स्थगित.. – शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी सुरू होते आंदोलन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफी,दिव्यांगांना निधी यासह १७ मागण्यांसाठी ८ जून २०२५ पासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते.अमरावती जिल्ह्याच्या तिवसा तालुक्यातील मोझरीमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरू होते.विरोधी पक्षातील नेत्यांसह विविध संघटनांनी बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला होता.त्यानुसार सदरच्या आंदोलनाची महायुती सरकारने दखल घेत बच्चू कडू यांना लेखी आश्वासन दिल्याने तब्बल सातव्या दिवशी म्हणजेच आज,शनिवार १४ जून रोजी अन्नत्याग आंदोलन आणि चक्का जाम आंदोलन स्थगित करीत असल्याची घोषणा केली आहे.त्यांनी म्हटले की, सरकारतर्फे लेखी आश्वासनानंतर अन्नत्याग आंदोलन स्थगित केले आहे,याची सर्वांनी नोंद घ्यावी.तसेच उद्या,रविवार १५ जून होणारे चक्काजाम हे देखील स्थगित करण्यात आले आहे,असे बच्चू कडू यांनी सोशल मीडियावर पोस्ट करीत सांगितले आहे.तत्पूर्वी
काल शुक्रवारी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आंदोलन स्थळी जाऊन बच्चू कडू यांची भेट घेतली होती.या भेटीवेळी त्यांनी बच्चू कडू यांच्याशी चर्चा केली.त्यानंतर सरकारच्या वतीने बच्चू कडू यांना लेखी आश्वासन दिले.
शेतकरी कर्ज माफीसाठी १५ दिवसांमधे उच्चस्तरीय समिती नेमली जाईल.समितीचा अहवाल प्राप्त झाल्यावर कर्ज माफी संदर्भात निर्णय घेण्यात येईल तथा थकीत कर्जदाराच्या सक्तीच्या वसुलीला स्थगिती देणे व नवीन कर्ज वाटप करण्यासाठी बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल.दिव्यांगाच्या मानधन वाढी बाबत ३० जून च्या पुरवणी बजेट मध्ये तरतूद करण्यात येईल.उर्वरित मुद्यावर संबंधित मंत्री तथा मुख्यमंत्री महोदय यांचे सोबत बैठक घेऊन मागण्या निकाली काढल्या जातील. सरकारकडून प्रमुख मागण्यांसदर्भात लेखी आश्वासन देण्यात आल्यानंतर बच्चू कडू यांनी चक्का जाम आंदोलन स्थगित करत असल्याची घोषणा केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्त्वाची; सर्व शैक्षणिक संस्था सकाळच्या सत्रात सुरू ठेवण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-दिवसेंदिवस उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.अश्यातच चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाची...

चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच उडाला भडका; पतीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-स्वयंपाकघरातील गॅस लिकेज असल्याने चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच आगीचा अचानकपणे भडका उडाला आणि काही क्षणातच सिलिंडरचा जोरदार स्फोट झाला.दरम्यान,संपूर्ण घरात...

वाहनधारकांसाठी दिलासा; गडचिरोली शहरातील ट्रॅफिक सिग्नल काही वेळासाठी राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदर्भातीलच नव्हे तर राज्याच्या विविध जिल्ह्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने जीवाची लाहीलाही होत आहे.अश्यातच शहरातील महत्त्वाच्या...

उष्णतेची तीव्रता; प्रखर उन्हामुळे शेतातच पडली बेशुद्ध.. – शेतकरी महिलेचा मृत्यू; नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उष्णतेचा पारा चढल्याने आरोग्य विभागासह प्रशासन सतर्क झाले आहे.त्यातच,नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहे.विशेष म्हणजे,दुपारी १२...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!