Saturday, June 13, 2026
Homeछत्रपती संभाजी नगरमनोज जरांगे पाटील येत्या ४ जुन पासून बसणार उपोषणाला…-जरांगे नी केली घोषणा…

मनोज जरांगे पाटील येत्या ४ जुन पासून बसणार उपोषणाला…-जरांगे नी केली घोषणा…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

छत्रपती संभाजीनगर :- गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनी मोठी घोषणा केली आहे.आम्ही येत्या चार जून रोजी उपोषणाला बसणार आहोत; असे मनोज जरांगे यांनी सांगितले आहे.येत्या चार जून रोजी जरांगे नारायण गडावर सभा घेणार आहेत.त्यानंतर चार जून रोजी ते उपोषणाला बसणार आहेत.चार जून हा मुहूर्त वगैरे काही नाही.स्वतःच्या लेकराला न्याय देण्यात आम्हाला आनंद आहे; असे जरांगे यांनी सांगितले आहे.

मराठा कोणत्याही पक्षाचा असू द्या.४ जून रोजी सकाळी नऊ वाजता उपोषण सुरू होणार आहे.या लढ्यात सामील होण्यासाठी माझ्या समाजाला आव्हान करायची गरज नाही.लोकसभा निवडणुकीमध्ये मी नाही.आम्ही कुणाचा प्रचार केला नाही.कुणाला निवडून आणण्याचेही आम्ही आवाहन केलेले नाही.आमचा महाविकास आघाडी किंवा महायुतीला पाठिंबा नव्हता.मी फक्त उमेदवारांना पाडण्याचे आवाहन केले.कोणाला पाडायचे हे मराठा समाजाल कळलेले आहे; असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणुकीच्या काळात महाराष्ट्रात कधीच आले नव्हते.मात्र आता मोदी गोधड्यांसहित येथे आले आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या दहा वर्षांत माध्यमांना कधीच बोलले नाहीत. आता मात्र ते माध्यमांसमोर बोलत आहेत.पूर्वी ते कुणाचाच प्रचार करत नव्हते.मात्र ते आता सगळ्यांचा प्रचार करायला लागले आहेत.ही वेळ भाजपच्या काही मोजक्या नेत्यांवर आली आहे.या सगळ्या परिस्थितीला भाजपचे पाच स्थानिक नेते जबाबदार आहेत.या लोकांना बारा बलुतेदार,दलित,मुस्लीम, धनगरांबद्दल द्वेष आहे; असा आरोप जरांगे यांनी केला आहे.

मी कुणालाच पाठिंबा दिलेला नाही.मी कुणालाच पाठींबा देत नाही.नोकरदारांची पदोन्नती होत नाही. दहा टक्के आरक्षण लोकांच्या कामाचे नाही.आता सामान्य मराठ्यांना वाटायला लागलंय की भरत्या थांबल्या आहेत.विधानसभेत गणित बिघडवणार नाही.मैदानातच मी राहणार आहे. सगे-सोयऱ्याची अंमलबजावणी करायला हवी. मराठा आणि कुणबी एकच आहे. हा कायदा पारित केला नाही तर मी मैदानात उतरणार आहे.फडणवीस,शिंदे यांना आवाहन आहे की,आमच्या हक्काचं आम्हाला द्या. दिलं नाही तर २८८ जागांवर आम्ही सर्व जाती-धर्माचे लोक निवडणूक लढवणार आहोत; असा इशाराही जरांगे यांनी दिला.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

त्वरा करा..! रेशन दुकानातून तांदूळ अन् गहू उचलण्यासाठी उरले केवळ दोनच दिवस..

उद्रेक न्युज वृत्त :-गरजू नागरिकांना पुरवठा विभागातर्फे स्वस्त धान्य दुकानांमधून धान्य वितरण करण्यात येते.मे व जून महिन्याचे धान्य वाटप करण्याची अंतिम तारीख १५ जून...

खर्रा खाणाऱ्यांनो सावधान..! बाजारात नकली तंबाखूचा शिरकाव.. – मशीनच्या सहाय्याने नकली तंबाखू तयार करणाऱ्यासह ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विदर्भातील बऱ्याचश्या जिल्ह्यात आजही जवळपास ७० ते ८० टक्के लोकं खर्रा खाण्याचे शौकीन आहेत.तंबाखूची वाढती मागणी लक्षात घेता "मरणारे मरोत आणि...

देसाईगंज शहरातील पाणी पुरवठा योजनेचे काम संथगतीने करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाईची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत देसाईगंज शहरात कोट्यवधी रुपयांचे पाणी पुरवठा योजनेचे बांधकाम संथगतीने सुरू असल्याने कामाच्या विलंबामुळे शहरातील नागरिकांना पिण्याच्या...

बांधकाम कामगार योजनांचा लाभ घेण्यासाठी ९० दिवस काम केल्याचे बनावट प्रमाणपत्र; ११ जणांवर गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कंत्राटदार,ऑनलाइन सेवा केंद्र संचालक व एजंट यांच्या संगनमताने करण्यात आलेल्या बोगस कामगार नोंदणीचे रॅकेट उघडकीस येताच तब्बल ११ जणांवर गुन्हे दाखल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!