Sunday, April 19, 2026
Homeछत्रपती संभाजी नगरमनोज जरांगे पाटील येत्या ४ जुन पासून बसणार उपोषणाला…-जरांगे नी केली घोषणा…

मनोज जरांगे पाटील येत्या ४ जुन पासून बसणार उपोषणाला…-जरांगे नी केली घोषणा…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

छत्रपती संभाजीनगर :- गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनी मोठी घोषणा केली आहे.आम्ही येत्या चार जून रोजी उपोषणाला बसणार आहोत; असे मनोज जरांगे यांनी सांगितले आहे.येत्या चार जून रोजी जरांगे नारायण गडावर सभा घेणार आहेत.त्यानंतर चार जून रोजी ते उपोषणाला बसणार आहेत.चार जून हा मुहूर्त वगैरे काही नाही.स्वतःच्या लेकराला न्याय देण्यात आम्हाला आनंद आहे; असे जरांगे यांनी सांगितले आहे.

मराठा कोणत्याही पक्षाचा असू द्या.४ जून रोजी सकाळी नऊ वाजता उपोषण सुरू होणार आहे.या लढ्यात सामील होण्यासाठी माझ्या समाजाला आव्हान करायची गरज नाही.लोकसभा निवडणुकीमध्ये मी नाही.आम्ही कुणाचा प्रचार केला नाही.कुणाला निवडून आणण्याचेही आम्ही आवाहन केलेले नाही.आमचा महाविकास आघाडी किंवा महायुतीला पाठिंबा नव्हता.मी फक्त उमेदवारांना पाडण्याचे आवाहन केले.कोणाला पाडायचे हे मराठा समाजाल कळलेले आहे; असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणुकीच्या काळात महाराष्ट्रात कधीच आले नव्हते.मात्र आता मोदी गोधड्यांसहित येथे आले आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या दहा वर्षांत माध्यमांना कधीच बोलले नाहीत. आता मात्र ते माध्यमांसमोर बोलत आहेत.पूर्वी ते कुणाचाच प्रचार करत नव्हते.मात्र ते आता सगळ्यांचा प्रचार करायला लागले आहेत.ही वेळ भाजपच्या काही मोजक्या नेत्यांवर आली आहे.या सगळ्या परिस्थितीला भाजपचे पाच स्थानिक नेते जबाबदार आहेत.या लोकांना बारा बलुतेदार,दलित,मुस्लीम, धनगरांबद्दल द्वेष आहे; असा आरोप जरांगे यांनी केला आहे.

मी कुणालाच पाठिंबा दिलेला नाही.मी कुणालाच पाठींबा देत नाही.नोकरदारांची पदोन्नती होत नाही. दहा टक्के आरक्षण लोकांच्या कामाचे नाही.आता सामान्य मराठ्यांना वाटायला लागलंय की भरत्या थांबल्या आहेत.विधानसभेत गणित बिघडवणार नाही.मैदानातच मी राहणार आहे. सगे-सोयऱ्याची अंमलबजावणी करायला हवी. मराठा आणि कुणबी एकच आहे. हा कायदा पारित केला नाही तर मी मैदानात उतरणार आहे.फडणवीस,शिंदे यांना आवाहन आहे की,आमच्या हक्काचं आम्हाला द्या. दिलं नाही तर २८८ जागांवर आम्ही सर्व जाती-धर्माचे लोक निवडणूक लढवणार आहोत; असा इशाराही जरांगे यांनी दिला.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्त्वाची; सर्व शैक्षणिक संस्था सकाळच्या सत्रात सुरू ठेवण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-दिवसेंदिवस उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.अश्यातच चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाची...

चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच उडाला भडका; पतीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-स्वयंपाकघरातील गॅस लिकेज असल्याने चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच आगीचा अचानकपणे भडका उडाला आणि काही क्षणातच सिलिंडरचा जोरदार स्फोट झाला.दरम्यान,संपूर्ण घरात...

वाहनधारकांसाठी दिलासा; गडचिरोली शहरातील ट्रॅफिक सिग्नल काही वेळासाठी राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदर्भातीलच नव्हे तर राज्याच्या विविध जिल्ह्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने जीवाची लाहीलाही होत आहे.अश्यातच शहरातील महत्त्वाच्या...

उष्णतेची तीव्रता; प्रखर उन्हामुळे शेतातच पडली बेशुद्ध.. – शेतकरी महिलेचा मृत्यू; नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उष्णतेचा पारा चढल्याने आरोग्य विभागासह प्रशासन सतर्क झाले आहे.त्यातच,नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहे.विशेष म्हणजे,दुपारी १२...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!