Saturday, May 30, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोलीसह चंद्रपूर जिल्ह्यात अवकाळी पाऊस ११ मे पर्यंत करणार शेतकऱ्यांचा पिच्छा..

गडचिरोलीसह चंद्रपूर जिल्ह्यात अवकाळी पाऊस ११ मे पर्यंत करणार शेतकऱ्यांचा पिच्छा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :-दिवसा कडक उन तर सायंकाळच्या सुमारास तसेच रात्री वादळ वाऱ्यासह विजांचे कडकडाट करीत अवकाळी पाऊस विदर्भासह सर्वत्र हजेरी लावू लागला आहे.गेल्या बऱ्याच दिवसांपासून अवकाळी पावसाचा मुक्काम सर्वत्र वाढल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे धानपीक निघण्याच्या तयारीत असतांनाच अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचेसह धडकी भरली आहे.अशातच आजपासून गडचिरोली जिल्ह्यात तर उद्यापासून चंद्रपूर जिल्ह्यात ११ मे पर्यंत अवकाळी पाऊस शेतकऱ्यांचा पिच्छा सोडणार नसल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.तर शुक्रवार ९ मे व शनिवार १० मे रोजी गोंदिया, भंडारा,वर्धा व नागपूर या चार जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी सोसाट्याच्या वाराची ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने अवकाळी पावसाची शक्यता वर्तविली आहे.शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी मोठ्या आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत असतांनाच यात आणखी भर पडून निसर्गाची अवकृपा झेलावी लागत आहे.त्यामुळे जगाचा पोशिंदा म्हटल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांनी काय करावे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

हाताची दोन बोटे दाखवून सेल्फी काढत असाल तर सावधान..!

उद्रेक न्युज वृत्त :-डिजिटल युगात सायबर गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होतांना दिसून येत आहे.काही कालावधीपासून डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून नागरिकांची लाखो रुपयांपासून ते कोट्यवधी रुपयांची फसवणूक...

‘जागतिक तंबाखू विरोधी दिन’ व ‘उच्चरक्तदाब दिना’ निमित्त पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- 'जागतिक तंबाखू विरोधी दिन' आणि 'जागतिक उच्चरक्तदाब दिना'चे औचित्य साधून गडचिरोली येथे एक विशेष आरोग्य जनजागृती आणि तपासणी शिबिर उत्साहात पार...

कसाई मातेचा माणुसकीला काळिमा फासणारा कारनामा; स्वतःचीच दोन मुले विकली दोन लाखात.. – अल्पवयीन मुलीसोबत भयंकर कृत्य..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-काही कालावधीपासून चंद्रपूर जिल्ह्यात खतरनाक कारनामे उघडकीस येऊ लागलेत.विविध कारनामे उघड होत असतांनाच नुकताच एका कसाई मातेचा माणुसकीला काळिमा फासणारा कारनामा...

आदिवासी महामंडळाच्या नियोजनशून्यतेमुळे शेतकरी संकटात; रब्बीची धान खरेदी केंद्रे अद्याप बंदच.. – गोदामे जुन्याच धानाने गच्च भरलेली..

उद्रेक न्युज वृत्त  गौरव नागपूरकर/देसाईगंज :-रब्बी हंगामातील धान खरेदीसाठी आदिवासी विकास महामंडळाची खरेदी केंद्रे अद्याप सुरू न झाल्याने देसाईगंज(वडसा)परिसरासह गडचिरोली जिल्ह्यातील हजारो शेतकरी तीव्र चिंतेत सापडले...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!