Saturday, September 12, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोलीसह चंद्रपूर जिल्ह्यात अवकाळी पाऊस ११ मे पर्यंत करणार शेतकऱ्यांचा पिच्छा..

गडचिरोलीसह चंद्रपूर जिल्ह्यात अवकाळी पाऊस ११ मे पर्यंत करणार शेतकऱ्यांचा पिच्छा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :-दिवसा कडक उन तर सायंकाळच्या सुमारास तसेच रात्री वादळ वाऱ्यासह विजांचे कडकडाट करीत अवकाळी पाऊस विदर्भासह सर्वत्र हजेरी लावू लागला आहे.गेल्या बऱ्याच दिवसांपासून अवकाळी पावसाचा मुक्काम सर्वत्र वाढल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे धानपीक निघण्याच्या तयारीत असतांनाच अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचेसह धडकी भरली आहे.अशातच आजपासून गडचिरोली जिल्ह्यात तर उद्यापासून चंद्रपूर जिल्ह्यात ११ मे पर्यंत अवकाळी पाऊस शेतकऱ्यांचा पिच्छा सोडणार नसल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.तर शुक्रवार ९ मे व शनिवार १० मे रोजी गोंदिया, भंडारा,वर्धा व नागपूर या चार जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी सोसाट्याच्या वाराची ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने अवकाळी पावसाची शक्यता वर्तविली आहे.शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी मोठ्या आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत असतांनाच यात आणखी भर पडून निसर्गाची अवकृपा झेलावी लागत आहे.त्यामुळे जगाचा पोशिंदा म्हटल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांनी काय करावे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सासऱ्याने केला सुनेचा खून अन् स्वतःच मारली विहिरीत उडी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या यशोधरानगर पोलिस ठाणे हद्दीच्या पिवळी नदी परिसरातील पाहुणे ले-आऊटमध्ये एक खळबळ उडवणारी घटना आज,शनिवार १२ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस...

राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता; दोन दिवस पावसाचे..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.पुढील दोन दिवस राज्यातील विविध भागात पावसाची तीव्रता कायम राहणार...

नोकरीचे खोटे नियुक्तीपत्र दाखवून दोन महिलांची फसवणूक; दोघांवर गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-मंत्रालयात चांगली ओळख असल्याची बतावणी करून सरकारी रुग्णालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत दोन महिलांची तब्बल १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा...

आता ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार विस्तार अधिकाऱ्यांकडे; विस्तार अधिकारी बनले प्रशासक..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सुरळीत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!