Thursday, April 30, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्ह्यातील रेल्वेचा प्रश्न खासदार नामदेव किरसान यांनी संसदेत केला उपस्थित…

गडचिरोली जिल्ह्यातील रेल्वेचा प्रश्न खासदार नामदेव किरसान यांनी संसदेत केला उपस्थित…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली:-मागील अनेक वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यातील रेल्वेचा प्रश्न प्रलंबित आहे.प्रत्यक्षात रेल्वेचे काम संथगतीने सुरू आहे.त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.वडसा-गडचिरोली रेल्वे मार्गाचे काम जलदगतीने करावे व बंद असलेल्या रेल्वेगाड्या चालू करण्याची मागणी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी लोकसभेत केली. कोरोनाकाळापासून बलारशहा-वडसा-गोंदिया मार्गावरील काही ट्रेन बंद आहेत.त्यामुळे या मार्गांवर आवागमन करणाऱ्या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.तर दुसरीकडे सिरोंचा,अहेरी भागातील रस्ते खराब असल्याने व नागपूरचा प्रवास या मार्गाने लांब होत असल्याने या भागातील नागरिक काजीपेठ मार्गे,काजीपेठ अजनी पॅसेंजर ट्रेनने प्रवास करीत होते.मात्र,ती ट्रेनसुद्धा कोरोनाकाळात बंद केल्यापासून अद्याप सुरू केली नाही.अहेरी-सिरोंचा परिसरातील नागरिकांना आवागमनाकरिता त्रास होत असून,वडसा ते चांदा फोर्ट,चांदाफोर्ट ते गोंदिया,गोंदिया ते रायपूर,काजीपेठ ते अजनी (नागपूर) या गाड्या कोरोनाकाळापासून बंद आहेत. त्या गाड्या पूर्ववत सुरू करण्यात याव्यात.गडचिरोली-वडसा,नागभीड-नागपूर रेल्वेचे काम जलदगतीने पूर्ण करण्यात यावे.वडसा आणि अन्य महत्वाच्या ठिकाणी जिथे रेल्वेच्या खाली भुयारी मार्ग तयार करण्यात आले आहेत.तिथे तुडुंब पाणी भरत असल्याने लोकांना प्रवासाकरिता अडचण निर्माण होत आहे.अशा ठिकाणी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी खा.डॉ.नामदेव किरसान यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान रेल्वेमंत्री वैष्णव यांच्याकडे केली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर कुरखेडा नगरपंचायत सफाई कामगारांच्या बेमुदत संपावर तोडगा; संप मागे..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा नगरपंचायत अंतर्गत कार्यरत सफाई कामगारांंनी थकीत वेतनाकरीता मागील २३ एप्रीलपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते.त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण...

कायदा हा लवचिक आणि बदलत्या काळाशी सुसंगत असावा- सर्वोच्च न्यायालय – गर्भपाताची परवानगी दिली नाही; तर पीडितेच्या मनावर आयुष्यभर न पुसली जाणारी जखम आणि...

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच २४ एप्रिल २०२६ रोजी न्यायमूर्ती बी.व्ही.नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने एका १५ वर्षीय बलात्कार पिडीत तरुणीला ३० आठवड्यांचा...

बच्चू कडूंनी धनुष्यबाण घेतला हाती; शेतकरी,मजूर,दिव्यांगांसाठी निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दिव्यांग,शेतकरी आणि गोरगरिबांसाठी लढणारा 'रॉबिनहूड' नेता माजी मंत्री तथा प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री...

शहरी भागात क्युआर कोड असलेली विवाह प्रमाणपत्रे द्या.. – देसाईगंज भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत सध्या स्थितीत अनेक शासकीय कागदपत्रे ऑनलाइन आणि सुरक्षित केली जात आहेत.यात विवाह नोंदणी प्रमाणपत्राचाही समावेश आहे.विवाह नोंदणी प्रमाणपत्राला विशेष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!