Thursday, April 16, 2026
Homeकोरचीकोरची शहरातील डांबरी रस्त्याची लागली वाट- सबंधित विभाग गेला निद्रावस्थेत

कोरची शहरातील डांबरी रस्त्याची लागली वाट- सबंधित विभाग गेला निद्रावस्थेत

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

कोरची :- गडचिरोलीजिल्ह्यातील कोरची शहरातील तहसिल मुख्यालयाकडे जाणाऱ्या  २०० ते ३०० मीटर डांबरी रस्त्याची पुरती वाट लागली असल्याने सर्वसामान्य नागरिक,दुचाकीस्वार,चारचाकी वाहन व इतर वाहनधारकांना कमालीचा त्रास व वाहन चालवितांना तारेवरची कसरत करावी लागत असूनही याकडे संबंधित विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट चित्र निर्माण झाले आहे. 

कोरची तालुका अतिदुर्गम,नक्षलग्रस्त व मागासवर्गीयांचा तालुका म्हणून गणला जातो. तालुक्यात अनेक शासकीय कार्यालये असून यातील अनेक अधिकारी,कर्मचारी वर्ग मुख्यालयी राहत नसल्याने अनेक समस्यांच्या विळख्यात कोरची शहर व ग्रामीण भाग सापडला आहे.अशातच थातूरमातूर कामांची भर पडल्याने कंत्रादारांची चांदी तर सर्वसामान्य नागरिकांची वांदी; असे चित्र निर्माण झाले आहे.त्यामुळेच ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ होत असूनही संबंधित विभागाचे अधिकारी,कर्मचारी निद्रावस्थेत गेले की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

लाखोंचे काम केले जाते; मात्र काही कालावधीतच पुरती वाट लागत असल्याने रस्ता की खड्डा,पैश्याचा अड्डा असे म्हणणे वावगे ठरणार नाही.यासाठी दुर्लक्ष न करता वा तात्पुरती मलमपट्टी न करता उखडलेला डांबरी रस्ता तात्काळ दुरुस्त करावा; अशी मागणी कोरची शहर वासियांनी केली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला...

आता प्रत्येक लाभार्थी कुटुंबास मिळणार तीन लिटर रॉकेल..

उद्रेक न्युज वृत्त :-जमाना कितीही बदलला तरीही 'जुनं ते सोनं' अशी अवस्था केवळ आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!