Thursday, April 16, 2026
Homeबीडकर्ज मागणीच्या तगाद्याला कंटाळून; मुख्याध्यापकाची गळफास घेऊन आत्महत्या

कर्ज मागणीच्या तगाद्याला कंटाळून; मुख्याध्यापकाची गळफास घेऊन आत्महत्या

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

बीड : कर्ज मागणीच्या हप्त्याच्या तगाद्याला कंटाळून जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाने गळफास घेऊन आत्महत्या केली.ही धक्कादायक घटना बीडच्या धारूर तालुक्यातील आसरडोह शिवारात घडली आहे.नितीन लक्ष्मण पाटोळे वय ३४असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव आहे.

मुख्याध्यापक नितीन पाटोळे यांनी बीडच्या माजलगाव येथील मंगलनाथ मल्टीस्टेटच्या दिंद्रूड शाखेकडून २०१९ मध्‍ये वैयक्तिक कर्ज घेतले होते. सुरूवातीला १० हजार रुपये हप्त्याने कर्जाची परतफेड केली. मात्र कोरोना काळात काही हप्ते थकले.त्यानंतर जून २०२२ रोजीपासून १५ हजार रुपये हप्ता ते भरत होते.तरी देखील मंगलनाथ मल्टीस्टेटचे वसूली पथकातील अधिकाऱ्यांनी कर्जफेडीसाठी तगादा लावला होता.त्यांना सातत्याने त्रास देऊन कारवाईची धमकी देत होते.यामुळे पाटोळे व्यथित होते.यातूनच कंटाळून त्यांनी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याची चर्चा आहे.

नितीन पाटोळे यांच्या पश्चात आई- वडील,पत्नी,दोन मुली असा आप्त परिवार असून त्यांच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज राज्याच्या पर्यावरण,वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे चंद्रपुरात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्याच्या पर्यावरण,वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे ह्या आज,गुरुवार १६ एप्रिल रोजी चंद्रपूर दौऱ्यावर असणार असून आज सकाळी अकरा वाजता...

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!