- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-केवळ जिल्ह्यातच नाही,तर अख्ख्या महाराष्ट्रात शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरची खरेदी करतो म्हटले तर कुठे ११० रुपये तर कुठे १२० रुपये मोजावे लागतात.हुज्जत घालतो म्हटले तर तुम्हाला जिथून घ्यायचे आहे,तिथून १०० रुपयांत स्टॅम्प खरेदी करा, अशी अरेरावीची भाषा अनेक स्टॅम्प विक्रेते करतांना दिसून येतात.मुख्यत्वे प्रतिज्ञापत्र,भाडेकरार,संमती पत्र, नाव दुरुस्ती,वारसान फेरफार,नोटरी वा इतर कामांकरिता स्टॅम्प पेपरची आवश्यकता असते.अश्यातच शासनाने याचे मूल्य ठरवून दिलेले असतांनाही त्यापेक्षा जास्त रक्कम मोजावी लागत असल्याने अशा स्टॅम्प विक्रेत्यांवर कारवाई करून त्यांचा परवाना रद्द करावी,अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.याबाबत कुणीही तक्रार करीत नसल्याने स्टॅम्प विक्रेते मर्जीने जास्त दर आकारून स्टॅम्प पेपरची विक्री करीत असल्याचे दिसून येते.त्यातच विद्यार्थ्यांपासून सर्वच घटकातील सामान्य माणसाचा मुद्रांकाशी(स्टॅम्प)संबंध येत असतो.डुप्लिकेट सर्टिफिकेट,गॅप सर्टिफिकेट, डोमिसाईल,राष्ट्रीयत्व,जातीचे प्रमाणपत्र,सौदा पावती, करारनामा,प्रतिज्ञापत्र, खरेदीखत,वाटणीपत्र आदी कारणांसाठी मुद्रांकाचा वापर होतो.मात्र,मूळ किंमतीपेक्षा अधिक दराने या मुद्रांकाची विक्री करून सामान्यांची अडवणूक केली जात आहे.मूळ किंमतीपेक्षा जास्त दराने मुद्रांक विक्री करू नये,असा नियम आहे.त्यानंतरही स्टॅम्प व्हेंडर(मुद्रांक विक्रेते) अतिरिक्त रक्कम आकारत असल्याचे सर्वश्रुत आहे. ग्राहकही झंझट नको म्हणून जादा रक्कम देतात.स्टॅम्प विक्रेत्यांना विक्रीवर ३ टक्के कमिशन मिळते.व्हेंडरला ठरलेले कमिशन मिळत असतांना जास्तीचे पैसे कशासाठी? हा गंभीर सवाल आहे.महिन्याला लाखो रुपयांचे स्टॅम्प एक व्हेंडर विकतो.त्यातून त्यांना चांगली कमाई होते.त्यामुळे त्यांनी जास्तीचे पैसे घेऊन ग्राहकांची पिळवणूक करू नये.अधिकाऱ्यांनी कॅबिनबाहेर निघून ग्राहकांची समस्या सोडवावी.स्टॅम्प पेपर जास्त दराने विकले जातात,अशी ग्राहकांची ओरड असूनही कारवाई मात्र शून्यच.त्यातच अधिकारी म्हणतात,लेखी तक्रार केल्यास नक्कीच कारवाई करू.
- Advertisement -

